12th result  team lokshahi
महाराष्ट्र

HSC Result : कोकण विभागाची बाजी तर मुंबईचा सर्वात कमी निकाल

अमरावतीचा निकाल 96 टक्केपेक्षा जास्त

Published by : Team Lokshahi

महाराष्ट्र राज्य मंडळाचा बारावीचा निकाल अखेर आज जाहीर झाला आहे. यंदाच्या निकालात मुंबई विभाग सर्वात मागे राहिला तर कोकण विभागाने बाजी मारली. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Minister Varsha Gaikwad) यांनी बारावीचा निकाल (Maharashtra 12th Result) 08 जूनला जाहीर होण्याची घोषणा केली होती. त्यानंतर सकाळी 11 वाजता निकाल जाहीर झाला. विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजता निकाल पाहता येणार आहे.

राज्यातून सर्वाधिक निकाल हा कोकण विभागाचा तब्बल 97.21 टक्के लागला आहे. सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा 90.91 टक्के लागला आहे.

पाह विभागानुसार निकाल

पुणे- 93.61%

नागपूर- 96.52%

औरंगाबाद- 94.97%

मुंबई- 90.91%

कोल्हापूर - 95.07%

अमरावती - 96.34 %

नाशिक - 95.03%

लातूर- 95.25%

कोकण - 97.21%

दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनी आघाडी घेतली आहे. यावर्षी 95.35 टक्के मुली तर 93.29 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहे. म्हणजे परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा 2.06 टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा