(Maharashtra Weather Update) आजपासून पुन्हा पावसाला सुरुवात होणार आहे. काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. यातच आता आजपासून पुन्हा पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आजपासून पुढील पाच दिवस कोकणात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पावसाने काही दिवस विश्रांती घेतल्याने मुंबईसह राज्यात उकाड्यात वाढ झाली होती. उकाड्याने नागरिक हैराण झाले होते मात्र आता पाऊस पुढील पाच दिवस सक्रिय राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. 12 ते 17 जून पर्यंत मुंबईसह ठाणे रायगडात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे.
कोकणात हवामान विभागाकडून शेतकऱ्यांना आणि नागरिकाना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.