महाराष्ट्र

“आमची भेट राजकीय हेतूसाठी”, शरद पवारांच्या भेटीवर ममता बॅनर्जींचं स्पष्टीकरण

Published by : Lokshahi News

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आज दिल्लीत भेट घेणार होत्या. मात्र काही कारणाने ते भेटू शकले नाहीत. यामुळे दोघांमध्ये फोनवर चर्चा झाली. सध्या ममता बॅनर्जी राजधानीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी एक नवा नारा दिल्याचे समोर आले आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत की, लोकशाही पुढे गेली पाहिजे. लोकशाही वाचवा, देश वाचवा हा आमचा नारा आहे.

याआधी ममता बॅनर्जी यांनी '१० जनपथ' येथे काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. या भेटीवेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी देखील उपस्थित होते. सोनिया गांधींच्या निवासस्थानी जवळपास तासभर त्यांच्यात चर्चा झाली. त्याआधी मंगळवारी ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. बैठकीनंतर सौजन्य भेट असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

नरेंद्र मोदींविरोधात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी मोट बांधण्यासाठी ममतांचा हा दौरा असून तो महत्त्वपूर्ण मानला जात आहे. तृणमूल काँग्रेसच्या मुखपत्रातही 'एबार शपथ, चलो दिल्ली' याबाबतची घोषणा देण्यात आली आहे.

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, मी शरद पवारांशी बोलले. हा दौरा यशस्वी झाला आहे. आम्ही राजकीय हेतूसाठी भेटलो होतो. लोकशाही पुढे गेली पाहिजे. आमचा नारा 'लोकशाही वाचवा, देश वाचवा'. आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांना पाठिंबा देतोय. आम्ही दर दोन महिन्यांनी इथे येत राहू.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराचा गोड प्रसाद

Manikrav Kokate : रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी जिनॅस्ट संयुक्ताला क्रीडामंत्र्यांचा फोन; 'महाराष्ट्राची हिरकणी' म्हणून संबोधत गौरविले

Palghar Gas Leak : बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायुगळती; 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जखमी

Ganesh Festival Pune 2025 : बाप्पा पावला! गणेशोत्सवात 24 तास धावणार मेट्रो, एकदा पाहा वेळापत्रक