महाराष्ट्र

माणिकपुंज धरण ‘ओव्हर फ्लो’, नांदगाव तालुक्यातील काही गावांचा सिंचनाचा प्रश्न सुटणार

Published by : Lokshahi News

नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज धरण आज ओव्हर फ्लो झाल्याने नांदगाव शहर तसेच तालुक्यातील काही गावांचा पिण्याचा व सिंचनाचा प्रश्न मिटला आहे. नांदगावच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. नांदगाव तालुक्यात पर्जन्यमान कमी असल्याने दरवर्षी दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागतात.

तालुक्यातील पूर्व भागातील जळगांव बुद्रुक, न्यायडोंगरी, पिंपरखेड, मुळडोंगरी, सावरगाव, कासारी, बाणगांव, कसाबखेडा, जळगांव खुर्द, हिंगणे देहरे आदी गावांसह चाळीसगाव तालुक्यातील आठ गावांमध्ये सिंचनासाठी उपयुक्त ठरणार आहे. मागील तीन दिवसांपासून वरुणराजा सलग बरसत असल्याने नांदगावकरांनी समाधान व्यक्त केले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा