महाराष्ट्र

कांद्याच्या बाजारभावावरून कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा शेतकऱ्यांनाच सुनावलं , म्हणाले...

कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केलं आहे.

Published by : Siddhi Naringrekar

शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे नाशिकच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांबद्दल वक्तव्य केलं होते. त्यानंतर ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.

यातच आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केलं आहे. कांद्याच्या बाजारभावावरून बोलताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले की, "कांद्याची लागवड आणि निर्यांतबंदी हे दर वर्षाला बदलतं सूत्र आहे. एखाद्या शेतकऱ्याला 2-५ हजार रुपये भाव कांद्याला मिळाला म्हणजे गावातील सर्व शेतकरी कांदेच करत सुटतात हा पण चुकीचा संदेश आहे."

"त्यामुळे आपल्याला किती कांदा करायला मर्यादा आहे की नाही दुप्पट का तिप्पट. तुम्ही जर 50 पट कांदा करायला लागले तर 50 पट गेल्यावरती भाव पडणारच. त्यामुळे किती लागवड करावी आणि कशी करावी या संदर्भातलं मार्गदर्शन सरकारने करणं अपेक्षित आहे." असे माणिकराव कोकाटे म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Peanut Kadhi Recipe : आषाढीच्या उपवासाला तयार करा चविष्ट शेंगदाण्याची कढी

गरमागरम डाळ, भात अन् त्यावर तूप घालून खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या

Sanjay Raut : 'राज्याच्या सामाजिक, राजकीय वातावरणात नवे बदल घडणार'; संजय राऊतांचं विजयी मेळाव्याबाबत सूचक वक्तव्य

Latest Marathi News Update live : विधानभवन परिसरात प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक