महाराष्ट्र

...तर उद्यापासून पाणीही घेणार नाही; जरांगे पाटलांचा सरकारला पुन्हा इशारा

सरकारच्या जीआरनंतरही मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम आहेत. जीआरमध्ये सुधारणा करुन सरसकट आक्षणाची मागणी त्यांनी केली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

जालना : सरकारच्या जीआरनंतरही मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम आहेत. जीआरमध्ये सुधारणा करुन सरसकट आक्षणाची मागणी त्यांनी केली आहे. तर, सरकारचे चर्चेचे आमंत्रण मनोज जरांगे पाटील यांनी स्वीकारले आहे. यानुसार जरांगे पाटील यांचे शिष्टमंडळ सरकारसोबत चर्चा करण्यासाठी मुंबईला रवाना झाले आहे.

याबाबत बोलताना जरांगे पाटलांनी सरकारला अल्टीमेटम दिला आहे. आमचं शिष्टमंडळ मुंबईत चर्चा करायला जातंय. सरकारच्या निरोपाची वाट पाहतोय. उद्यापासून पाणीही पिणार नसल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. तसेच, मराठा समाजाने शांततेत आंदोलन करावं. कोणीही टोकाचं पाऊल उचलू नये, असे आवाहनही मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला केले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Chhatrapati Sambhajinagar : धनगर विद्यार्थ्यांच्या शिक्षण योजनेत भ्रष्टाचार; दोन शाळांची मान्यता रद्द, अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई

Latest Marathi News Update live : जनसुरक्षा विधेयक विधान परिषदेतही मंजूर

Dhadak 2 Trailer Out : पुन्हा एक हळवी प्रेमकहाणी; 'धडक 2' चा ट्रेलर लाँच

Mediclaim : विमा कंपन्यांकडून आरोग्य विमा क्लेमसाठी 24 तासांची अट शिथिल