महाराष्ट्र

मनोज जरांगे पाटलांचं भगवं वादळ नवी मुंबईत; आज मुंबईच्या दिशेने रवाना होणार

Published by : Siddhi Naringrekar

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने मराठा समाज मुंबईच्या दिशेने आज रवाना होणार आहेत. मनोज जरांगें पाटलांचं भगवं वादळ नवी मुंबईत धडकलं आहे. मनोज जरांगे हे वाशी मधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीत पोहचले असून त्यांची वाशीमध्ये सभा होणार आहे.

मराठा बांधवांच्या गर्दीमुळे वाहतुकीचीही समस्या निर्माण झाली. यासाठी पोलिसांनी जरांगेंना मार्ग बदलण्याची विनंती केली आहे. एपीएमसीच्या प्रशासकीय इमारतीमध्ये सर्वांची राहण्याची सोय करण्यात आली आहे. मुंबईत आमरण उपोषण करणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी पोलिसांनी नाकारली आहे. मात्र मनोज जरांगे आझाद मैदानावर आंदोलन करण्यास ठाम आहे.

दिनविशेष 17 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

BJP bike rally cancelled : 'या' कारणामुळे भाजपची दक्षिण मुंबईतील बाईक रॅली रद्द

Cards: पत्ते खेळण्याने होतात 'हे' आरोग्यदायी फायदे

CSK vs RCB : सामन्यात पावसाने खोडा घातल्यास बंगळुरुच्या अडचणी वाढणार? काय आहे समीकरण? जाणून घ्या

"२० तारखेला निवडणूक होऊद्या, २१ तारखेला मिटिंग लावतो आणि..."; नाशिकच्या सभेत उपमुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा