महाराष्ट्र

मनोज जरांगे पाटलांचं भगवं वादळ नवी मुंबईत; आज मुंबईच्या दिशेने रवाना होणार

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने मराठा समाज मुंबईच्या दिशेने आज रवाना होणार आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने मराठा समाज मुंबईच्या दिशेने आज रवाना होणार आहेत. मनोज जरांगें पाटलांचं भगवं वादळ नवी मुंबईत धडकलं आहे. मनोज जरांगे हे वाशी मधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीत पोहचले असून त्यांची वाशीमध्ये सभा होणार आहे.

मराठा बांधवांच्या गर्दीमुळे वाहतुकीचीही समस्या निर्माण झाली. यासाठी पोलिसांनी जरांगेंना मार्ग बदलण्याची विनंती केली आहे. एपीएमसीच्या प्रशासकीय इमारतीमध्ये सर्वांची राहण्याची सोय करण्यात आली आहे. मुंबईत आमरण उपोषण करणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी पोलिसांनी नाकारली आहे. मात्र मनोज जरांगे आझाद मैदानावर आंदोलन करण्यास ठाम आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Aajcha Suvichar : आजचा सुविचार

Mumbai Water Supply : मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली, विंधन विहीर खोदकामाला परवानगी

OBC : ओबीसी आरक्षणाच्या लढ्यात भरत कराड यांचा प्राणत्याग; कुटुंबाला आर्थिक मदतीची मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Weather News : गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नका; राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा, 'या' जिल्ह्यांना अलर्ट