महाराष्ट्र

मनोज जरांगे पाटलांचं भगवं वादळ नवी मुंबईत; आज मुंबईच्या दिशेने रवाना होणार

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने मराठा समाज मुंबईच्या दिशेने आज रवाना होणार आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने मराठा समाज मुंबईच्या दिशेने आज रवाना होणार आहेत. मनोज जरांगें पाटलांचं भगवं वादळ नवी मुंबईत धडकलं आहे. मनोज जरांगे हे वाशी मधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीत पोहचले असून त्यांची वाशीमध्ये सभा होणार आहे.

मराठा बांधवांच्या गर्दीमुळे वाहतुकीचीही समस्या निर्माण झाली. यासाठी पोलिसांनी जरांगेंना मार्ग बदलण्याची विनंती केली आहे. एपीएमसीच्या प्रशासकीय इमारतीमध्ये सर्वांची राहण्याची सोय करण्यात आली आहे. मुंबईत आमरण उपोषण करणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी पोलिसांनी नाकारली आहे. मात्र मनोज जरांगे आझाद मैदानावर आंदोलन करण्यास ठाम आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा