महाराष्ट्र

मराठ्यांच्या नादी लागू नका, 24 तारखेपर्यंत वेळ; जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

पुण्यातील राजगुरूनगरमध्ये जरांगेंची जाहीर सभा झाली. यावेळी जरांगे पाटलांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

राजगुरुनगर : सरकारकडून मराठ्यांची फसवणूक होते आहे. मराठ्यांच्या नादी लागू नका. तुमच्याकडे 24 तारखेपर्यंतचा वेळ आहे, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे. तसेच, आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असा निर्धारही जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे. पुण्यातील राजगुरूनगरमध्ये जरांगेंची जाहीर सभा झाली. यावेळी ते बोलत होते.

मराठा समाजातील एकाने आत्महत्या केली. मराठा समाज सुनील कावळेंचे बलिदान वाया जाऊ देणार नाही. त्याच्या लेकराला मराठा समाज कधीच माया कमी पडू देणार नाही. आतापर्यंत झालेल्या आत्महत्यांना सरकार जबाबदार असल्याचा आरोप मनोज जरांगेनी केला आहे.

तसेच, कुणीही आत्महत्या करायची नाही, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. आरक्षण वेळेत दिलं असतं तर आत्महत्या झाल्या नसत्या. सरकारनं विशेष अधिवेशन बोलावून कायदा पारित करावा, अशी मागणीही जरांगे पाटलांनी सरकारकडे केली आहे.

मी मरेपर्यंत मराठा समाजांशी गद्दरी करणार नाही. माझ्या जातीला न्याय देण्यासाठी मी उभा आहे. 24 तारखेपर्यंत काही बोलणार नाही. 22 ऑक्टोबरला पुढची दिशा ठरणार आहे. उद्रेक करायचा नाही. उद्रेक केला तर गुन्हे दाखल होतात. त्यामुळे आपण शांततेने आंदोलन करायचे आहे. उग्र आंदोलन करायचे नाही, असेही मनोज जरांगेंनी स्पष्ट केले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."

Home Remedies To Relieve Mouth Pain : तोंडातील फोडं, जळजळ आणि वेदना? आता मिळवा त्वरित आराम!