महाराष्ट्र

मराठ्यांच्या नादी लागू नका, 24 तारखेपर्यंत वेळ; जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

पुण्यातील राजगुरूनगरमध्ये जरांगेंची जाहीर सभा झाली. यावेळी जरांगे पाटलांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

राजगुरुनगर : सरकारकडून मराठ्यांची फसवणूक होते आहे. मराठ्यांच्या नादी लागू नका. तुमच्याकडे 24 तारखेपर्यंतचा वेळ आहे, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे. तसेच, आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असा निर्धारही जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे. पुण्यातील राजगुरूनगरमध्ये जरांगेंची जाहीर सभा झाली. यावेळी ते बोलत होते.

मराठा समाजातील एकाने आत्महत्या केली. मराठा समाज सुनील कावळेंचे बलिदान वाया जाऊ देणार नाही. त्याच्या लेकराला मराठा समाज कधीच माया कमी पडू देणार नाही. आतापर्यंत झालेल्या आत्महत्यांना सरकार जबाबदार असल्याचा आरोप मनोज जरांगेनी केला आहे.

तसेच, कुणीही आत्महत्या करायची नाही, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. आरक्षण वेळेत दिलं असतं तर आत्महत्या झाल्या नसत्या. सरकारनं विशेष अधिवेशन बोलावून कायदा पारित करावा, अशी मागणीही जरांगे पाटलांनी सरकारकडे केली आहे.

मी मरेपर्यंत मराठा समाजांशी गद्दरी करणार नाही. माझ्या जातीला न्याय देण्यासाठी मी उभा आहे. 24 तारखेपर्यंत काही बोलणार नाही. 22 ऑक्टोबरला पुढची दिशा ठरणार आहे. उद्रेक करायचा नाही. उद्रेक केला तर गुन्हे दाखल होतात. त्यामुळे आपण शांततेने आंदोलन करायचे आहे. उग्र आंदोलन करायचे नाही, असेही मनोज जरांगेंनी स्पष्ट केले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा