Maratha Reservation 
महाराष्ट्र

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांच्या मुंबईतील आंदोलनापूर्वीच वर्षा निवासस्थानी तब्बल दीड तास खलबतं

मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्यात येणार आहे.

Published by : Team Lokshahi

(Maratha Reservation) मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्यात येणार आहे. मराठा आरक्षणासाठी 29 ऑगस्ट रोजी मोठा मोर्चा मुंबईत दाखल होणार असल्याची घोषणा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी केली आहे. आंदोलन सुरु होण्यापूर्वी सरकारकडून हालचालींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर विविध बैठका सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर वर्षा बंगल्यावर सुमारे दीड तास मराठा आरक्षणासंदर्भात सविस्तर चर्चा झाली असल्याची माहिती मिळत आहे. या चर्चेतून तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जात असून, 29 ऑगस्टच्या मोर्च्यापूर्वीच सरकारकडून काही महत्वाची घोषणा होऊ शकते, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत येण्यापासून थांबवण्यासाठी विशेष रणनीती आखली गेल्याचे देखील बोललं जात आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुरक्षेचा प्रश्न महत्वाचा असल्याने मुंबईत या मोर्च्यामुळे कायदा-सुव्यवस्थेची स्थिती बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंदोलन होण्यापूर्वीच सरकार सकारात्मक निर्णय घेईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मराठा आरक्षणावरून राज्यात पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा