महाराष्ट्र

हुकुमशाहीने नाही तर शेतकरी हिताचे निर्णय घ्यावेत, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची टीका

Published by : Lokshahi News

उमाकांत अहिरराव, धुळे | केंद्र सरकारनं शेतकऱ्यांवर तीन काळे कायदे लादण्याचा प्रयत्न केला, मात्र शेतकऱ्यांच्या एकजुटी पुढे केंद्र सरकारला नमते घ्यावे लागले आणि तिन्ही कायदे मागे घेण्याची वेळ आली, यापुढे केंद्र सरकारने हुकुमशाही पद्धतीने निर्णय न घेता जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत, सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावेत असे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेतल्यानंतर केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर सत्तार यांनी जोरदार टीका केली.

देशात कुठल्याही सरकारने लोकप्रतिनिधींनी संविधानाला प्रमाण मानुन कामकाज करणे अपेक्षित आहे. एकतर्फी किंवा हुकूमशाही पद्धतीने या देशात निर्णय घेता येत नाहीत. जनतेला विश्वासात घेऊन त्यांच्या हिताचे निर्णय स्वीकारले जातात, यापुढे केंद्र सरकारने लोकशाही मूल्यांचा सन्मान करून निर्णय घ्यावेत अशी अपेक्षा सत्तार यांनी व्यक्त केली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा