महाराष्ट्र

समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या मॉन्टेकार्लो कंपनीला तब्बल ३२८ कोटी रुपयांचा दंड

Published by : Lokshahi News

सचिन बडे | औरंगाबाद : मुंबई ते नागपूर या समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या मॉन्टेकार्लो कंपनीला तब्बल ३२८ कोटी रुपयांचा दंड सर्वोच्च न्यायालयानेही कायम ठेवल्याने मोठी खळबळ उडालीय. मुंबई ते नागपूर या ७०० किलोमीटर अंतरातील जालना जिल्ह्यातील जवळपास २५ गावांमधून हा महामार्ग जातो. त्यातील १ हजार ३०० कोटीचे काम मेसर्स मॉन्टेकार्लो कंपनीने केले. मॉन्टेकार्लो या कंपनीकडून सुरू असताना त्या कंपनीने परवानगी नसताना आणि अवैधपणे खडी, मुरूम, माती या गौण खनिजासोबत वाळूचाही उपसा मोठ्या प्रमाणात केल्याची तक्रार होती.

जालन्याचे तहसीलदार श्रीकांत भुजबळ आणि बदनापूरच्या तत्कालीन तहसीलदार छाया पवार दोघांनी संयुक्तरीत्या दोन्ही तालुक्यातील समृध्दी महमार्गाची आणि जिथं अवैधरित्या गौण खनिज आणि उत्खनन केलेल्या स्थळाची पाहणी केली. यात जालना आणि बदनापूर या दोन तालुक्यात ३२८ कोटी रुपयांचे गौण खनिज हे परवानगीपेक्षा अधिकचे उत्खनन केल्याचे दिसून आले, त्यानुसार अहवाल दिला होता. त्यात जालना जिल्हाधिकारी कार्यालयांने ३२८ कोटी रुपयांचा दंड कंपनीला आकारण्यात आला होता.

समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या मेसर्स मॉन्टेकार्लो या कंपनीला दंड चुकीचा आकारण्यात आला असल्यानं दंड रद्द करावा अशा मागणीची याचिका कंपनीने औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती. औरंगाबाद खंडपीठात यावर सुनावणी झाल्यानंतर खंडपीठाने कंपनीची याचिका फेटाळली होती. त्यानंतर कंपनीने पुन्हा सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले. सर्वोच्च न्यायालयातही औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय कायम ठेवत मॉन्टेकार्लो कंपनीची याचिका फेटाळलीये. त्यामुळे मॉन्टेकार्लो या कंपनीला आता ३२८ कोटींचा दंड भरावा लागणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

PM Narendra Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक सन्मानित व्यक्ती

Malnourished Children : राज्यात कुपोषित बालकांचा आकडा धडकी भरवणारा ; महिला आणि बालविकास मंत्र्यांची माहिती

Deepika Padukone : दीपिका पदुकोण हॉलिवूडमध्ये इतिहास रचणार! 'Walk of Fame'वर स्थान मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री

Shubman Gill : शुभमन गिलचे इंग्लंडमध्ये ऐतिहासिक दुहेरी शतक; भारतीय क्रिकेटसाठी नवा अध्याय