महाराष्ट्र

“दाखवून देऊ… किसमे कितना है दम” काँग्रेसचा पुन्हा स्वबळाचा नारा

Published by : Lokshahi News

राज्यात महाविकास आघाडी सरकार असलं, तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी काँग्रेसने स्वबळाचा नारा देत दंड थोपटले आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याआधी स्वबळाचा नारा दिला होता. त्यानंतर आज मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनीही पुढील स्थानिक निवडणुकांमध्ये काँग्रेस स्वत:च्या बळावर रिंगणात उतरणार असल्याचे संकेत दिले आहेत.

आम्हाला तिसरा पक्ष म्हणतात, अशी खंत व्यक्त करत, आम्हाला एकट्याला लढू द्या, देखते है किसमे कितना है दम, अशी आव्हानाची भाषा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केली आहे. काँग्रेसला तिसरा पक्ष म्हटलं जातंय अशी खंत भाई जगतापांनी व्यक्त केली. येत्या निवडणुका या आम्हाला स्वबळावर लढू द्याव्यात अशी मागणी त्यांनी प्रभारी एच.के. पाटील यांच्याकडे केलीय.

महाराष्ट्राच्या प्रभारींनी हा संदेश सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडे पोहोचवावा, अशी विनंतीही त्यांनी केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यानंतर आता भाई जगतापांनीही स्वबळाचा नारा दिलाय.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा