महाराष्ट्र

Traffic Jam : मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी, प्रवाशांना मनस्ताप

माणगाव ते इंदापूरदरम्यान वाहनांच्या 8 ते 10 किलोमीटरच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

Published by : Team Lokshahi

कोकणात शिमगोत्सव साजरा करुन चाकरमानी आता परतीच्या प्रवासाला लागले आहेत. मात्र आता सगळ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रवासवाहतूक कोंडी होऊ नये यासाठी रविवारी महामार्गावर कशेडी ते खारपाडा दरम्यान अवजड वाहनांवर बंदी घातली. मात्र तरीही वाहनसंख्या वाढल्यान वाहतूक कोंडी झाली आहे.

माणगाव ते इंदापूरदरम्यान वाहनांच्या 8 ते 10 किलोमीटरच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यासाठी प्रवाशांना तब्बल दिड ते दोन तास इतका वेळ लागत होता. मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव आणि इंदापूर येथील बाह्य वळण रस्त्याची कामे सध्या रखडली आहेत. यासगळ्यांमुळे वाहनचालकांना अरुंद रस्त्यातून प्रवास करावा लागत आहे.

दोन्ही शहरातून वाहनांना ये जा करावे लागत आहे. अरुंद रस्ता आणि बाजारपेठामधील गर्दी यामुळे वाहतूक कोंडीची समस्या सातत्याने उद्भवत आहे. त्यामुळे दोन्ही बाह्य वळण मार्गांची कामे नवीन ठेकेदार नेमून तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली जात आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा