महाराष्ट्र

Traffic Jam : मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी, प्रवाशांना मनस्ताप

माणगाव ते इंदापूरदरम्यान वाहनांच्या 8 ते 10 किलोमीटरच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

Published by : Team Lokshahi

कोकणात शिमगोत्सव साजरा करुन चाकरमानी आता परतीच्या प्रवासाला लागले आहेत. मात्र आता सगळ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रवासवाहतूक कोंडी होऊ नये यासाठी रविवारी महामार्गावर कशेडी ते खारपाडा दरम्यान अवजड वाहनांवर बंदी घातली. मात्र तरीही वाहनसंख्या वाढल्यान वाहतूक कोंडी झाली आहे.

माणगाव ते इंदापूरदरम्यान वाहनांच्या 8 ते 10 किलोमीटरच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यासाठी प्रवाशांना तब्बल दिड ते दोन तास इतका वेळ लागत होता. मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव आणि इंदापूर येथील बाह्य वळण रस्त्याची कामे सध्या रखडली आहेत. यासगळ्यांमुळे वाहनचालकांना अरुंद रस्त्यातून प्रवास करावा लागत आहे.

दोन्ही शहरातून वाहनांना ये जा करावे लागत आहे. अरुंद रस्ता आणि बाजारपेठामधील गर्दी यामुळे वाहतूक कोंडीची समस्या सातत्याने उद्भवत आहे. त्यामुळे दोन्ही बाह्य वळण मार्गांची कामे नवीन ठेकेदार नेमून तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली जात आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Nashik Building Collapsed : नाशिकमध्ये इमारत कोसळली, सहा ते सातजण जखमी

Latest Marathi News Update live : जुन्या नाशिक परिसरातील त्रंबक पोलीस चौकी पाठीमागे इमारत कोसळली

Latest Marathi News Update live : मध्य रेल्वेच्या सुमारे 720 आणि पश्चिम रेल्वेच्या 100 लोकल फेऱ्या रद्द

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना रोजगारात नवीन प्रश्न निर्माण होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य