महाराष्ट्र

आरबीआयला बॅंकेला बॉम्बने उडवण्याची धमकी; गव्हर्नर आणि अर्थमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : मुंबईतील रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. ई-मेलद्वारे ही धमकी देण्यात आली असून यामुळे एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

माहितीनुसार, आरबीआय कार्यालय, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेसह 11 ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. या ईमेलमध्ये आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. पोलिसांनी या सर्व ठिकाणी शोध घेतला. मात्र काहीही आक्षेपार्ह आढळून आले नाही. याप्रकरणी एमआरए मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू करण्यात आला आहे.

काय आहे ई-मेलमध्ये?

मुंबईच्या वेगवेगळ्या ठिकाणी 11 बॉम्ब लावले आहेत. RBI ने खाजगी क्षेत्रातील बँकांसह भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा केला आहे. या घोटाळ्यात आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि काही उच्च बँकिंग अधिकारी तसेच भारताचे काही नामांकित मंत्री यांचा समावेश आहे. याप्रकरणी आमच्याकडे पुरेसे पुरावे आहेत. आरबीआय गव्हर्नर आणि अर्थमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि घोटाळ्याच्या संपूर्ण प्रकटीकरणासह एक प्रेस स्टेटमेंट जारी करा, अशी मागणी अज्ञातांनी ई-मेलद्वारे केली आहे.

"पाकिस्तानचा झेंडा घेऊन मिरवणाऱ्या उबाठाच्या उमेदवारांवर कारवाई करा"; किरण पावसकरांचा ठाकरेंवर हल्लाबोल

IPL 2024 : आरसीबीने CSK विरोधात रचला इतिहास; टी-२० क्रिकेटमध्ये 'हा' कारनामा करणारा ठरला पहिला संघ

"लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांमध्ये महाविकास आघाडीनेच बाजी मारलीय"; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा मोठा दावा

"एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायला तयार होतो"; शरद पवारांच्या विधानाला संजय राऊतांनी दिलं रोखठोक प्रत्युत्तर, म्हणाले...

Patanjali: बाबा रामदेव पुन्हा अडचणीत; पतंजलीवर मोठी कारवाई