थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Sandeep Deshpande) महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांसाठी काल मतदान पार पडलं. सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आणि संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता आला. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, पिंपरी–चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली–मिरज–कुपवाड, नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड–वाघाळा, परभणी, जालना, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर, चंद्रपूर, उल्हासनगर, कल्याण–डोंबिवली, भिवंडी–निजामपूर, मीरा–भाईंदर, वसई–विरार, पनवेल या 29 महानगरपालिकांमध्ये काल मतदान पार पडलं.
आज मतमोजणी पार पडणार असून सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. पालिकांवर कोणाचा दबादबा राहणार हे आज स्पष्ट होणार असून आता कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
या निकालाच्याआधी राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता संदीप देशपांडे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. संदीप देशपांडे म्हणाले की, 'आज मुंबई महानगरपालिकेचे निकाल आहेत. कोण जिंकेल कोण हरेल याचा निर्णय जनता करेलच पण ज्या हिमतीने माझ्या सहकारी महाराष्ट्र सैनिकांनी ही निवडणूक लढवली,मेहनत घेतली त्याबद्दल त्यांचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन' असे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.
Summary
महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांसाठी काल मतदान पार पडलं
आज सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होणार
निकालाच्याआधी संदीप देशपांडे यांचे ट्विट