महाराष्ट्र

वाहतूक कोंडी सूटणार ? पालघर, मुंबई, ठाण्यासाठी नवीन नियमावली

Published by : Lokshahi News

नमित पाटील, पालघर | पालघर – मुंबई – ठाण्यातील महामार्गावर वाहतूक कोंडीची मोठी समस्या वाहनधारकांना भेडसावत असते, ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आता पालघर जिल्हाधिकारी यांच्याकडून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

पालघर – मुंबई – ठाण्यातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पालघर जिल्हाधिकारी यांच्याकडून नवीन नियमावली जाहीर झाली आहे. या नव्या नियमानूसार उत्तरेकडून महाराष्ट्रात येणाऱ्या अवजड वाहनांसाठी ठराविक काळातच मुंबई ठाण्यात प्रवेश देण्यात येणार आहे. तर सकाळी 10 ते दुपारी 4, तर संध्याकाळी 6 ते पहाटे 6 वाजता पर्यंतच अवजड वाहनांना प्रवेश असणार आहे.

इतर वेळेत महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या अवजड वाहनांसाठी मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत पालघरमध्ये वाहनतळ असणार आहे. मागील आठवड्यात पालघर मध्ये नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती वाहनतळांची पाहणी केली होती.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup 2025 : ब्रोंको टेस्ट पास करा तरचं संघात चान्स! BCCI चा नवा नियम; ब्रोंको टेस्ट म्हणजे काय? Bronco Test

Rohit Pawar : शिखर बँक घोटाळाप्रकरणी आमदार रोहित पवारांची जातमुचलक्यावर सुटका

Raigad Boat Accident : रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, बचावकार्य युद्धपातळीवर

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली