महाराष्ट्र

संजय राऊत यांना दिलासा नाहीच; कोठडी पुन्हा वाढली

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांना ईडीने केली होती अटक

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना दिलासा मिळालेला नाही. संजय राऊत यांच्या कोठडीत आज पुन्हा वाढ झाली आहे. 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यामुळे आता संजय राऊत यांचा 5 सप्टेंबरपर्यंत तुरुंगात राहावे लागणार आहे.

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती. त्यानंतर त्यांना दोन वेळा कोठडी सुनावण्यात आली. आज त्यांची कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं. यावेळी ईडीने त्यांच्या कोठडीची मुदत वाढवण्याची मागणी केली. या सुनावणीत संजय राऊत यांची कोठडी 5 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे राऊत यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे.

काय आहे प्रकरण?

पत्राचाळ येथे म्हाडाचा भुखंड होता. हा भुखंड विकसित करण्यासाठी आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला काम दिले होते. पण त्यांनी ही जागा परस्पर खाजगी विकासकांना विकली. पत्राचाळमधील 672 रहिवाशींना 650 स्केअर फुटाचे घर देण्यात येणार होते. त्यांच्या या सोसायटीत अनेक अॅनिमिटी देण्यात येणार होत्या. रहिवाशांना 25 कोटी रुपये कार्पस फंड देण्यात येणार होते. त्यातून रहिवाश्यांचे मासिक मेंटेनेंस भरला जाणार होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadanvis On Vijayi Melava : विजयी मेळाव्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मानले खोचक आभार ; म्हणाले, "मला जबाबदार धरलं त्यासाठी..."

Nitesh Rane On Thackeray Brothers : "यांच्यात नवरा कोण आणि नवरी कोण?" ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया

Raj Thackeray : ''त्या' बद्दल दिलगिरी व्यक्त'; विजय मेळाव्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट

Shivsena on Vijayi Melava : विजयी मेळाव्यानंतर शिवसेनेचे कडवट बोल ! मोठ्या भावावर निशाणा तर लहान भावाचे कौतुक