महाराष्ट्र

विद्युत जोडणी अभावी शासकीय रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांट पडले धूळखात

Published by : Lokshahi News

बालाजी सुरवसे | उस्मानाबाद | राज्य सरकार कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटशी दोन हात करण्याची तयारी करीत असतानाच महावितरणच्या दुर्लक्षित कारभारामुळे जिल्ह्यातील प्रकल्प होत नाही. परिणामी विद्युत जोडणी पूर्ण झाली नाही म्हणून ऑक्सिजन प्लांट धूळखात पडले आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात विद्युत जोडणी अभावी शासकीय रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांट धूळखात पडले आहेत. कोरोनाकाळात जिल्ह्यात ऑक्सिजन न मिळाल्याने अनेक रुग्णांचे मृत्यू झाले होते. याच अनुषंगाने जिल्ह्यातील कळंब, परंडा, तुळजापुर व उमरगा येथील शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन निर्मितीसाठी प्लांट बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले. मात्र महावितरणने कळंब व परंडा येथील प्लांटला स्वतंत्र रोहित्र बसवून न दिल्याने ऑक्सिजन निर्मितीचे हे प्लांट बंद आहेत. तसेच तुळजापुर आणि उमरगा येथील प्लांटसुद्धा योग्य विद्युत पुरवठा होत नसल्याने बंदच आहेत. एकीकडे राज्य सरकार कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटशी दोन हात करण्याची तयारी करीत असतानाच महावितरणच्या दुर्लक्षित कारभारामुळे जिल्ह्यातील लाखों रुपये खर्चून बनविलेले हे प्रकल्प अद्यापही सुरू झालेले नाहीत. महावितरण कंपनीकडे याबाबतचा प्रस्ताव पाठविला आहे, मात्र त्यांनी अद्यापही काम सुरू केले नसल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितल आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र; म्हणाले...

शिरूर मतदारसंघाच्या ईव्हीएम स्ट्राँगरुममधील सीसीटीव्ही 24 तास बंद

Shambhuraj Desai : 4 तारखेला जेव्हा निकाल लागेल तेव्हा चांगल्या मताधिक्याने माननीय नरेश म्हस्के साहेब निवडून येतील

"पहिल्या चार टप्प्यातच आम्ही महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचा सुफडा साफ केला "; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा दावा

मोठी बातमी! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेला उदयपूरमधून अटक