महाराष्ट्र

परमबीर यांना अटक करणार नाही ; राज्य सरकारची कोर्टात ग्वाही

Published by : Lokshahi News

ठाणे पोलीस ठाण्यात अत्याचार प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याअंतर्गत २० मे पर्यंत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांना अटक करणार नाही, असे आश्वासन राज्य सरकारने कोर्टात दिले आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांना दिलासा मिळाला आहे.

परमबीर सिंग यांनी शिवीगाळ केली असल्याची तक्रार पोलीस अधिकारी भीमराव घाडगे यांनी अकोल्यात केली होती. हि तक्रार ठाणे पोलिसांत वर्ग करत ठाणे पोलिसांनी नव्याने गुन्हा दाखल केला. यावर परमबीर सिंह यांनी याचिका दाखल केली.

या याचिकेच्या सुनावणीत सिंग यांच्यावर ३० एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आणि आता तपास सुरू आहे. त्यामुळे पोलिसांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी थोडा वेळ हवा आहे, असे खंबाटा यांनी न्यायालयाला सांगितले. तोपर्यंत आम्ही (पोलीस) याचिकाकर्त्यांना (परमवीर सिंग) यांना अटक करणार नाही, असे खंबाटा यांनी म्हटले. न्यायालयाने त्यांचे हे विधान स्वीकारत या याचिकेवरील पुढील सुनावणी २० म रोजी ठेवली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Heavy Rain Alert : महाराष्ट्रानंतर आता 'या' राज्यात धुवांधार पावसाची एंट्री! येणारे चार दिवस सलग झोडपणार; 'या' जिल्ह्यांमध्ये IMD ने जारी केला अलर्ट

Saath Nibhana Saathiya Gopi Bahu : 'साथ निभाना साथिया' फेम 'गोपी बहू'ने गुपचुप केले लग्न, जाणून घ्या कोण आहे? जियाचा नवरा

GST Slab : आता अनेक वस्तूंवरील कर दर कमी होणार! GST चे चार पैकी दोन स्लॅब रद्द होणार; सर्वसामान्यांना मोठा दिलासा

Uttar Pradesh Crime : नोरा फतेहीसारखी फिगर मिळवण्यासाठी पतीने केला पत्नीचा छळ; नेमकं प्रकरण काय?