महाराष्ट्र

तिहेरी हत्याकांडाने पुणे हादरलं! दिराने वहिनी दोन मुलांना पेट्रोल टाकून जाळले

Published by : Shweta Shigvan-Kavankar

चंद्रशेखर भांगे | पुणे : तिहेरी हत्याकांडाने पुणे हादरले आहे. पुण्यातील कोंढव्याजवळ असलेल्या पिसोळी येथे ही घटना उघडकीस आली आहे. नात्याने वहिनी असलेल्या महिलेला तिच्या दोन चिमुरड्यासह दीराने पेट्रोल टाकून जाळले आहे. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे.

वैभव वाघमारे असे आरोपीचे नाव आहे. आम्रपाली वाघमारे असे महिलेचे नाव असून रोशनी (वय 6) व आदित्य (वय 4) अशी दोन्ही मुलांची नावे आहेत.

मूळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील असलेले वैभव वाघमारे आणि आम्रपाली वाघमारे हे दोघे प्रेमप्रकरणातून काही महिन्यापूर्वी गावावरुन पळून पुण्याला आले होते. पिसोळी जवळील एका सोसायटीत आम्रपाली धुणीभांड्याचे काम करून पत्र्याच्या शेडमध्ये ते दोघेही राहू लागले. वैभव सुद्धा एमपीएससीचा अभ्यास करून रात्रपाळीला वॉचमनची नोकरी करत होता. दरम्यान, आम्रपालीचे दुसऱ्या पुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय वैभवला आला होता. याच कारणावारुन आम्रपाली आणि वैभवमध्ये वाद झाला असता रागाच्या भरात आरोपीने पेट्रोल टाकून आम्रपाली आणि तिच्या दोन मुलांची हत्या केली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा