थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Rahul Narwekar) 29 महानगरपालिकांमध्ये मतदान आज होणार आहे. सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून असून संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, पिंपरी–चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली–मिरज–कुपवाड, नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड–वाघाळा, परभणी, जालना, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर, चंद्रपूर, उल्हासनगर, कल्याण–डोंबिवली, भिवंडी–निजामपूर, मीरा–भाईंदर, वसई–विरार, पनवेल या 29 महानगरपालिकांमध्ये मतदान होणार आहे.
यातच राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल नार्वेकर म्हणाले की, "मुंबईत फक्त विकास हा एकच मुद्दा चालणार आहे. मुंबईकरांना विकास पाहिजे, चांगले रस्ते पाहिजे, मेट्रो रेल पाहिजे, ट्रान्स हार्बर लिंक पाहिजे, कोस्टल रोड पाहिजे. हे सर्व बघून मतदान होईल. 100 टक्के भारतीय जनता पक्षाचा महापौर होईल." असे राहुल नार्वेकर म्हणाले.
Summary
'मुंबईत भावनिक नाही तर विकासाचं राजकारण चालेल'
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा दावा
यंदा महापौर हा भाजपचाच असेल- नार्वेकर