महाराष्ट्र

मनमाडवरून रद्द झालेल्या प्रवासी गाड्या सुरळीत

Published by : Lokshahi News

पाऊस आणि भूस्खलनामुळे रद्द झालेल्या सर्व प्रवासी गाड्या सुरळीत झाल्या आहेत. मुंबईत झालेल्या पावसामुळे प्रवासी गाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता.

मुंबईमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पाऊस व मध्य रेल्वेच्या कसारा घाटात दरड कोसळली होती. तर, उंबरमाळी स्थानकाजवळ रेल्वे रुळाखालील भराव वाहून गेल्याने वाहतूक देखील ठप्प झाली होती. अखेर मनमाड – मुंबई रेल्वे वाहतूक पूर्वपदावर आली आहे.

मनमाड रेल्वे स्थानकातून सुटणाऱ्या पंचवटी एक्स्प्रेससह उत्तर भारतातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशी गाड्या सुरळीत सुरू आहे. सर्व प्रवाशी गाड्या वेळेत धावत आहे. मुंबईकडून येणाऱ्या गाड्याही वेळेत सुरू असल्याने प्रवाश्यांना चांगला दिलासा मिळाला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा