महाराष्ट्र

मनमाडवरून रद्द झालेल्या प्रवासी गाड्या सुरळीत

Published by : Lokshahi News

पाऊस आणि भूस्खलनामुळे रद्द झालेल्या सर्व प्रवासी गाड्या सुरळीत झाल्या आहेत. मुंबईत झालेल्या पावसामुळे प्रवासी गाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता.

मुंबईमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पाऊस व मध्य रेल्वेच्या कसारा घाटात दरड कोसळली होती. तर, उंबरमाळी स्थानकाजवळ रेल्वे रुळाखालील भराव वाहून गेल्याने वाहतूक देखील ठप्प झाली होती. अखेर मनमाड – मुंबई रेल्वे वाहतूक पूर्वपदावर आली आहे.

मनमाड रेल्वे स्थानकातून सुटणाऱ्या पंचवटी एक्स्प्रेससह उत्तर भारतातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशी गाड्या सुरळीत सुरू आहे. सर्व प्रवाशी गाड्या वेळेत धावत आहे. मुंबईकडून येणाऱ्या गाड्याही वेळेत सुरू असल्याने प्रवाश्यांना चांगला दिलासा मिळाला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."