महाराष्ट्र

लसीकरणावरून राजेश टोपेंचा केंद्रावर हल्लाबोल

Published by : Lokshahi News

लसीकरणाबाबत महाराष्ट्र सातत्याने देशात प्रथम क्रमांकावर आहे. केंद्र सरकारने अखंडित लस पुरवठा करण्याची जबाबदारी पार पाडावी लसीकरणात महाराष्ट्र सातत्याने देशात अग्रेसर असून याची कल्पना केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना नक्कीच आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्राला अखंडित लस पुरवठा करावा त्यासाठीचे शंभर टक्के नियोजन आम्ही केले असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. लसीचे डोस फुकट जाण्याचे प्रमाणही राज्यात खूप कमी आहे.

राज्यातील कोरोना रुग्ण व लोकसंख्येची आकडेवारी केंद्राकडे असल्याने महाराष्ट्राला लसीचे किती डोस दिले पाहिजे याची नेमकी आकडेवारीही केंद्राकडे नक्कीच असायला हवी असेही राजेश टोपे यांनी सांगितले. राज्यांनी कसे नियोजन करावे हे सांगण्यापेक्षा हर्षवर्धन यांनी अखंडित लस पुरवठा कसा करणार ते सांगितले तर बरे होईल, असा टोलाही राजेश टोपे यांनी लगावला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?

Mahayuti : महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला; भाजपच्या वाट्याला 48% पदं येणार

Latest Marathi News Update live : वाशिम जिल्ह्यात सलग 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस