Rajgad 
महाराष्ट्र

Rajgad : पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! किल्ले राजगड, तोरणा, मढेघाट, धरण परिसर पर्यटनासाठी 'या' तारखेपर्यंत राहणार बंद

किल्ले तोरणा, राजगड, तसेच पानशेत, वरसगाव, गुंजवणी धरण परिसर, मढे घाट ह्या क्षेत्रात पर्यटनासाठी बंदी केली आहे.

Published by : Team Lokshahi

(Rajgad) राजगड तालुक्यात पावसाचा कहर पाहायला मिळत असून याच पार्श्वभूमीवर 22 जूनपासून 30 सप्टेंबरपर्यंत किल्ले तोरणा, राजगड, तसेच पानशेत, वरसगाव, गुंजवणी धरण परिसर, मढे घाट ह्या क्षेत्रात पर्यटनासाठी बंदी केली आहे. राजगड तालुक्यात जोरदार पाऊस आणि धुक्यांचे साम्राज्य पसरले आहे.

गडावर तसेच धबधब्यांच्या ठिकाणी निसरड्या वाटा , अरुंद रस्ते, कोसळणाऱ्या दरडींमुळे दुर्घटना होण्याची शक्यता असते. या दुर्घटना टाळण्यासाठी या तालुक्यातील पर्यटनाला 30 सप्टेंबर पर्यंत बंदी घालण्यात आली आहे. या बंदीचे आदेश भोरचे उपविभागीय अधिकारी डॉ. विकास सारात यांनी दिले आहेत.

या परिसरात फलक लावण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची देखील माहिती मिळत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा