महाराष्ट्र

“वेळा प्रत्येकाच्या येत असतात, हिशोब चुकते करायला मी समर्थ!”

Published by : Lokshahi News

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या कोट्यातून राजू शेट्टी यांचे नाव बाजूला गेल्याच्या चर्चेनंतर स्वतः राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विधान परिषद हे साधन नाही आमदारकी नाही मिळाली म्हणून आमच्याकडे 10-20 लोक आत्महत्या करतील असं काही नाही, असे स्पष्टीकरण शेट्टी यांनी दिले आहे.
प्रत्येकाच्या वेळा येत असतात. त्या वेळेस आपण ठरवू काय करायचं ते मात्र त्यावेळेस एकेकाचे हिशोब चुकते करू त्यासाठी मी समर्थ आहे असा इशारा त्यांनी दिलाय. ते कोल्हापूरच्या चिंचवाड गावात पत्रकारांशी बोलत होते.

काय म्हणाले शेट्टी?

दरम्यान, लोकसभा निवडणुकीपूर्वी समझोता झाला होता. त्यानुसार एक विधान परिषदेत जागा स्वाभिमानाला मिळणार असल्याचं शेट्टी यांनी सांगितलं. त्यासाठी एवढी चर्चा कशासाठी आणि आमच्या स्वातंत्र्यावर गदा आणून आमच्यावर मेहेरबानी आणि दया कोणी करत नाही. आम्ही राजकारण करतो ते चळवळ मजबूत करण्यासाठी.. राजकारण हे आमचं साधन आहे. हे आमचं साध्य नाही आणि भविष्यातही असणार नाही. त्यामुळे आम्हाला फारसा फरक पडत नाही.

त्यामुळे प्रत्येकाच्या वेळा येत असतात. त्या वेळेस आपण ठरवू काय करायचं ते.. मात्र वेळ आल्यास एकेकाचे हिशोब चुकते करू.. त्यासाठी मी समर्थ आहे अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी इशारा दिलाय.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराचा गोड प्रसाद

Manikrav Kokate : रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी जिनॅस्ट संयुक्ताला क्रीडामंत्र्यांचा फोन; 'महाराष्ट्राची हिरकणी' म्हणून संबोधत गौरविले

Palghar Gas Leak : बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायुगळती; 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जखमी

Ganesh Festival Pune 2025 : बाप्पा पावला! गणेशोत्सवात 24 तास धावणार मेट्रो, एकदा पाहा वेळापत्रक