महाराष्ट्र

सरकार चुकतंय तिथे मी बोलणार, सांगलीत राजू शेट्टींचा हल्लाबोल

Published by : Lokshahi News

सांगलीच्या इस्लामपूरमध्ये आज पूरग्रस्तांसाठी जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी  राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. पण पूरग्रस्तांना मदत देताना सरकार चुकलंय त्यामुळे मी रस्त्यावर उतरलो आहे. शिवाय मी महाविकास आघाडीचा गुलाम नाही, असे ते म्हणाले.

महाविकास आघाडी निर्माण करणाऱ्यांपैकी मी एक आहे. पण मी आजही महाविकास आघाडी मध्ये आहे. मात्र पूरग्रस्तांना मदत देताना सरकार चुकलंय, मी पॅकेज देणारा माणूस नाही असे मुख्यमंत्री म्हणाले होते.

पण पूरग्रस्तांना सरकारकडून काहीच मिळाले नाही. पुनर्वसन करणार होते. पण पुनर्वसन बाबत सरकारची व्यापाऱ्यांची भूमिका झाली आहे. आज इस्लामपूरमध्ये सर्वपक्षीय भव्य मोर्चा निघाला. या मोर्च्यात मोठ्या संख्येने शेतकरी सर्वपक्षीय नेते आणि पूरग्रस्त उपस्थित होते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा