Raju Shetti 
महाराष्ट्र

जलयुक्त शिवारमुळे महापूर आला ?; राजू शेट्टी म्हणाले…

Published by : Lokshahi News

संजय देसाई, सांगली | जलयुक्त शिवारामुळे राज्यात महापूर येत असल्याचं मत पर्यावरतज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी व्यक्त केलं होतं. त्यावरून सत्ताधाऱ्यांनी भाजपला घेरलेलं असतानाच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्रमध्ये वसंतदादा पासून आतापर्यत झालेल्या सर्वच मुख्यमंत्र्यांनी 'पाणी आडवा, पाणी जिरवा'चा नारा दिला होता, त्यामुळे जलयुक्त शिवारच्या कामामुळे मराठवाड्यात पूर आला हे म्हणणे  घाईगडबडीचे ठरेल, असे म्हणत त्यांनी भाजपची पाठराखण केली आहे.

खासदार राजू शेट्टी 7 ऑक्टोबरपासून अतिवृष्टी मधील नुकसानीच्या पाहणीसाठी मराठवाडा दौरा करणार आहेत. तसेच नुसते घोषणा करुन पोट भरत नाही, मदत द्या अन्यथा सरकारला उग्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल असा इशाराच शेट्टी यांनी दिला. राष्ट्रीय आपत्ती निवारण कोषमध्ये पडून असलेले हजारो कोटी रुपयाचा केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी सढळ हाताने वापर करावा असा सल्ला त्यांनी दिला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : "कोण जैन लोक आहेत जी...", फडणवीसांच्या भेटीनंतर राज ठाकरेंनी बेस्ट पतपेढी पराभवासह अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू