Raju Shetti 
महाराष्ट्र

जलयुक्त शिवारमुळे महापूर आला ?; राजू शेट्टी म्हणाले…

Published by : Lokshahi News

संजय देसाई, सांगली | जलयुक्त शिवारामुळे राज्यात महापूर येत असल्याचं मत पर्यावरतज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी व्यक्त केलं होतं. त्यावरून सत्ताधाऱ्यांनी भाजपला घेरलेलं असतानाच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्रमध्ये वसंतदादा पासून आतापर्यत झालेल्या सर्वच मुख्यमंत्र्यांनी 'पाणी आडवा, पाणी जिरवा'चा नारा दिला होता, त्यामुळे जलयुक्त शिवारच्या कामामुळे मराठवाड्यात पूर आला हे म्हणणे  घाईगडबडीचे ठरेल, असे म्हणत त्यांनी भाजपची पाठराखण केली आहे.

खासदार राजू शेट्टी 7 ऑक्टोबरपासून अतिवृष्टी मधील नुकसानीच्या पाहणीसाठी मराठवाडा दौरा करणार आहेत. तसेच नुसते घोषणा करुन पोट भरत नाही, मदत द्या अन्यथा सरकारला उग्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल असा इशाराच शेट्टी यांनी दिला. राष्ट्रीय आपत्ती निवारण कोषमध्ये पडून असलेले हजारो कोटी रुपयाचा केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी सढळ हाताने वापर करावा असा सल्ला त्यांनी दिला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा