Raju Shetti 
महाराष्ट्र

खासदार राजू शेट्टी वीज वितरण कंपनीचे सर्व घोटाळे बाहेर काढणार!

Published by : Vikrant Shinde

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टींनी आज पत्रकार परीषद घेत साखर कारखाना घोटाळ्यापेक्षा वीज वितरण कंपनी घोटाळा मोठा आहे व तो घोटाळा मी लवकरच बाहेर काढणार आहे असा थेट इशाराच दिला आहे.

आज जाहीर पत्रकार परीषद घेत राजू शेट्टी ह्यांनी सरकारवर निशाणा साधलाय. त्याचबरोबर वीज वितरण कंपनीलाही त्यांनी इशारा दिला आहे. राजू शेट्टी म्हणाले, "सरकार फक्त आश्वासन देत आहे. त्यामुळे सरकारवर आम्ही शंभर टक्के विश्वास ठेवणार नाही. या पूर्वी सरकारने फसवले आहे. त्यामुळे जन आंदोलन उभे करून सरकारला गुडघे टेकायला लावणार" ह्या शब्दांत राजू शेट्टी यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे.

"शेतकऱ्यांना मोफत वीज देणे हा शेतकऱ्यांचा मुलभूत अधिकार आहे. परंतु, तो अधिकार शेतकऱ्याला मिळत नाही. शेतकऱ्याला सर्पदंश झाला तर साप वन्यजीव नाही म्हणून शेतकऱ्याला मदत मिळत नाही. परंतु, शेतकऱ्याने सापाला मारले तर वन्यजीव मारला म्हणून शेतकऱ्यावर कारवाई होते. शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन त्यावर धरणे बांधली आणि विजनिर्मिती करण्यात आली.परंतु, याच शेतकऱ्यांना आज वीज मिळत नाही", अशी खंत राजू शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केली. सर्व माहिती गोळा करायचे काम सुरु असून या प्रकरणी न्यायालयात जाणार असल्याचेही राजू शेट्टी यांनी सांगितले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा