महाराष्ट्र

राजू शेट्टींच्या जलसमाधी परिक्रमेला सुरुवात

Published by : Lokshahi News

पूरग्रस्तांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी यासाठी शेतकरी नेते राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने हजारो कार्यकर्त्यांसह राजू शेट्टी (Raju Shetty)नृसिंहवाडी येथे जलसमाधी घेणार आहेत.

तत्पूर्वी प्रयाग चिखली तालुका करवीर येथे त्यांनी दत्त मंदिरात दत्ताला अभिषेक घातला. त्यानंतर ते नृसिंहवाडी येथे जाणार आहेत. शेकडो कार्यकर्त्यांनी चिखली येथे या आंदोलनात सहभागी होण्यासाठी हजेरी लावली आहे.

ही जलसमाधी परिक्रमा प्रयाग चिखलीतून सुरू होऊन रविवारी 5 सप्टेंबरला नृसिंहवाडी येथे या परिक्रमेची सांगता होईल. त्यानंतर हजारो कार्यकर्त्यांसह जलसमाधी घेण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर

Raj Thackeray - Uddhav Thackeray : विजयी मेळाव्यात 'या' नेत्यांचीही होणार भाषणं; तर उद्धव ठाकरेंच्या भाषणाचे होईल समारोप

Saamana Editorial : '...ते अर्थात ‘ठाकरे भाऊ' विजयी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर सामनातून नेमकं काय म्हटलंय?