महाराष्ट्र

एफआरपीच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांमध्ये नाराजी, राजू शेट्टी आक्रमक

Published by : Lokshahi News

सांगलीत नवे नक्षलवादी आणि माफिया निर्माण करायचे नसतील, तर शेतकऱ्यांचं समाधान करा, असा धमकीवजा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे. संपूर्ण देशाला ही केंद्र सरकारची चाल महागात पडेल, असे ते म्हणाले.

कृषी मूल्य आयोग हे केंद्र सरकारच्या हातचे बाहुले झाले आहेत. कृषी मूल्य आयोगाने उसाच्या एफआरपी मध्ये स्वतःची पाठ थोपटल्याचा आरोप शेट्टींनी केला.

केंद्र सरकारने कृषी तज्ञा आणावेत आठशे टनमध्ये ऊस पिकवून दाखवावा.. शेतकऱ्याची चेष्टा थांबवावी म्हणून तर आज शेतकरी गांजा पिकवायची मागणी करू लागला आहे. आज तालिबानचं उत्पन्न गांजा आहे हे विसरू नका, अशी आठवण शेट्टींनी करून दिली.

काय म्हणाले शेट्टी ?

तुम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर असच वागणार असाल तर हा देश तालिबानच्या दिशेने जाईल याची जाणीव ठेवा. नवे नक्षलवादी आणि माफिया निर्माण करायचे नसतील तर शेतकऱ्यांचं समाधान करा. नाहीतर संपूर्ण देशाला ही केंद्र सरकारची चाल महागात पडेल..असे वक्तव्य माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं