महाराष्ट्र

आघाडीतुन शिवसेना बाहेर पडेल आणि भाजपासोबत येऊन राज्यात नवी सत्ता येईल – रामदास आठवले

Published by : Lokshahi News

महाविकास आघाडीतुन शिवसेना बाहेर पडेल आणि भाजपसोबत येऊन राज्यात नवी सत्ता येईल,असे भाकीत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते तेव्हा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या विधानाला दुजोरा देत आठवले यांनी महाविकास आघाडीचे सरकार लवकरच जाईल,असा विश्वासही व्यक्त केला आहे,

सोमवार पासूम संसदीय अधिवेशन पार पडणार आहे. या अधिवेशनामध्ये विरोधकांनी गोंधळ घालू नये,असे आवाहन केले आहे. तसेच शेतकऱ्यांची मागणी असणारे कृषी कायदा केंद्र सरकारने मागे घेतले आहेत, त्यामुळे आता आंदोलन थांबले पाहिजे, आणि आंदोलन सुरूच राहणार असले तर शेतकरी नेते राकेश टिकेत यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी मंत्री आठवले यांनी केली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा