महाराष्ट्र

आंबा घाटात दरड कोसळली; वाहतूक पूर्णत बंद

Published by : Lokshahi News

निसार शेख, रत्नागिरी | रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील अंबाघाट येथे दरड कोसळल्याने वाहतूक बंद झाली आहे. परतीचा पाऊस जोरदार सुरू असल्यामुळे ही दरड कोसळली आहे.

दख्खन गावा जवळ ही दरड कोसळली आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या वतीने ही दरड हटवण्याचे काम सुरू आहे.मात्र किती वेळ लागेल हे अनिश्चित आहे. त्याचप्रमाणे अवजड वाहतूक बंद असताना पुन्हा एकदा आंबा घाट कोसळल्याने वाहनधारकांची पंचायत झाली आहे.

सर्वच प्रकारची वाहतूक बंद झाली आहे.पोलीस प्रशासन ,सार्वजनिक बांधकाम विभाग ह्या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.त्यामुळे वाहतूक केव्हा सुरू होईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?

Mahayuti : महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला; भाजपच्या वाट्याला 48% पदं येणार

Latest Marathi News Update live : वाशिम जिल्ह्यात सलग 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस