महाराष्ट्र

“राज्यात गुंडगिरी सुरूय, तत्काळ राष्ट्रपती शासन लावा”, आमदार रवी राणांची माहिती

Published by : Lokshahi News

भाजाप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्यांना पोलिसांनी अटक केली. तत्पूर्वी शिवसेना कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येऊन भाजप कार्यालयावर हल्ला करत तोडफोड केली होती.

यावर बडनेराचे आमदार रवी राणा यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. देशाचा स्वतंत्र दिवस मुख्यमंत्र्यांना माहिती नसतो. ते त्यांना पीएला विचारावं लागत. त्यामुळे आता जर बाळासाहेब ठाकरे असते तर उद्धव ठाकरे यांचे कान पकडले असते,असे राणा म्हणाले.

तर शिवसेना कार्यकर्त्यांनी केलेली तोडफोड ही गुंडगिरी सारखी आहे. शिवसेना गुंडगिरी करत आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था राहिली नाही. त्यामुळे आता राज्यात तत्काळ राष्ट्रपती शासन लावले पाहिजे, अशी मागणी आमदार रवी राणा यांनी केली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : मराठीच्या वाकड्यात जाणाऱ्यांवर राज ठाकरे कडाडले, जाणून घ्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

Chandrashekhar Bawankule On Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "खरा अजेंडा ‘म’ म्हणजे ‘मराठी’ नाही, तर..." ; विजय मेळाव्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया

Sanjay Rauat : "हे सरकार म्हणजे हवा भरलेले फुगे"; विजयी मेळाव्यानंतर राऊतांची पहिली प्रतिक्रिया

Uddhav Thackeray on Devendra Fadanvis : आंतरपाट दूर करणारे अनाजी पंत म्हणत उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर थेट निशाणा