महाराष्ट्र

कैद्यांना दिलासा; वकील, कुटुंबियांना भेटता येणार

Published by : Lokshahi News

लोकशाही न्यूज नेटवर्क | राज्यातील कारागृहातील कैद्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. आता कैद्यांना पुन्हा वकील व कुटुंबातील सदस्यांची भेट घेता येणार आहे. कोरोना महामारीमुळे लॉकडाऊनमध्ये कैद्यांना कुटुंबियांशी भेटण्यास मनाई करण्यात आली होती.

महाराष्ट्र कारागृहातील कैद्यांना पुन्हा वकील व कुटुंबातील सदस्यांची भेट घेता येऊ शकणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च 2020 पासून भेटणे बंद करण्यात आले होते, पंरतू आता महाराष्ट्रातील तुरूंगात सोमवारी कैद्यांचे कुटूंबिय पुन्हा भेट घेवू शकणार आहेत. तर आर्थर रोड जेल (मुंबई सेंट्रल जेल) आणि ठाणे कारागृहात बुधवारपासून वकिलांना भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता जवळपास एक वर्षानंतर कैदी आपल्या कुटुंबातील सदस्यांना भेटू शकतील.

महाराष्ट्र कारागृहांचे अतिरिक्त महासंचालक सुनील रामानंद यांनी या संदर्भात संबंधित जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांशी समन्वय साधण्यास सांगून महाराष्ट्र राज्यातील सर्व मध्यवर्ती व जिल्हा कारागृह अधीक्षकांना परिपत्रक काढले आहे.

सुरक्षा प्रोटोकॉलनुसार, पाच जणांऐवजी केवळ दोनच लोकांना एकाच वेळी भेट दिली जाणार आहे. तसेच 15 वर्षांपेक्षा कमी तर 55 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना भेट घेता येणार नाही.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : मराठीच्या वाकड्यात जाणाऱ्यांवर राज ठाकरे कडाडले, जाणून घ्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

Chandrashekhar Bawankule On Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "खरा अजेंडा ‘म’ म्हणजे ‘मराठी’ नाही, तर..." ; विजय मेळाव्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया

Sanjay Rauat : "हे सरकार म्हणजे हवा भरलेले फुगे"; विजयी मेळाव्यानंतर राऊतांची पहिली प्रतिक्रिया

Uddhav Thackeray on Devendra Fadanvis : आंतरपाट दूर करणारे अनाजी पंत म्हणत उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर थेट निशाणा