महाराष्ट्र

‘या’ ६ राज्यांतून महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठी ‘RT-PCR’ चाचणी बंधनकारक

Published by : Lokshahi News

राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रात दरदिवशी ६० हजारांहून अधिक नवे कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. दरम्यान, राज्य सरकारनं ६ राज्यांना अतिसंवेदनशील म्हणून घोषित केलं आहे. या राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, दिल्ली एनसीआर आणि उत्तराखंड राज्यांना कोरोनाचे अतिसंवेदनशील उगमस्थान घोषित केलं आहे. या राज्यांमधून महाराष्ट्रात येणाऱ्यांना त्याआधी ४८ तासांमध्ये केलेली आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह रिपोर्ट सादर करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. राज्यात प्रवेश करताना किंवा रेल्वेस्थानकावर आल्यावर रिपोर्ट दाखवणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

गेल्या चोवीस तासांत राज्यात ६८ हजार ६३१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर ४५ हजार ६५४ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. तर गेल्या चोवीस तासांत ५०३ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sushil Kedia Apologizes : मराठीबद्दल वादग्रस्त विधानानंतर अखेर सुशील केडियाने मागितली माफी

Raj Thackeray : '...आणि मराठीसाठी बाळासाहेबांनी सत्तेला लाथ मारली'; राज ठाकरेंनी सांगितलं मराठीचं बाळकडू कसं मिळालं

Raj Thackeray : 'आता हे जातीच कार्ड खेळणार...तुम्हाला एकत्र येऊ देणार नाहीत'; राज ठाकरेंचा मराठी माणसाला सतर्क राहण्याचा इशारा

Uddhav Thackeray on Sushil Kedia : "सुशील केडिया कोण भेडिया, ती सर्व भाजपची पिलावळं", उद्धव ठाकरे यांची जोरदार टीका