महाराष्ट्र

संगमनेरमध्ये कोरोनानं काढलं डोक वर; 27 गावं लॉकडाऊन

Published by : Lokshahi News

आदेश वाकळे, संगमनेर | संगमनेर तालुक्यासह ग्रामीण भागात मागील काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा डोकं वर काढले आहे. त्यामुळे तिसरी लाटेचा धोका लक्षात घेता उपाययोजना म्हणून प्रशासनाने संगमनेर तालुक्यातील 27 गावे 5 ऑक्टोंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहे.

संगमनेर तालुक्यात रुग्णसंख्या वाढत आहे.आज शहरासह तालुक्याच्या रुग्ण संख्येत वाढ झाल्याने तालुका आरोग्य व्यवस्थेची चिंता दुप्पट झाली आहे. एकीकडे वरीष्ठ पातळ्यांवरुन आदेशा मागून आदेशाची रिघ लागलेली असताना दुसरीकडे त्याची अंमलबजावणीच होत नसल्याने तालुका पुन्हा एकदा कोविडच्या सावटाखाली आला आहे.

रुग्णवाढ गेली तीन दिवस खालावलेली होती.आज मात्र पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आज शहरातील ११ जणांसह तालुक्यातील 155 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुक्याच्या एकूण रुग्णसंख्येने आता एकूण 33 हजार रुग्णसंख्या झाली आहे. त्यामुळे दहा पेक्षा अधिक कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत असलेले गावं लॉकडाऊन करण्यास सुरुवात केली आहे. आता 27 गावे 5 ऑक्टोंबर पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहे..खळी, पिंप्री, लौकि, जाखुरी पानोडी,मणोली घुलेवाडी असे एकूण 27 गावे प्रशासनाने बंद केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sahyadri Hospital : सह्याद्री ग्रुपचा ताबा मणिपाल कंपनीकडे; तब्बल 6 हजार 400 कोटींचा करार

Kapil Sharma : 'या' कॉमेडीयनच्या कॅनडामधील कॅफेमध्ये गोळीबार; गाडीच्या आतून गोळ्या झाडल्या अन्...

Jansuraksha Act In Maharashtra : काय आहे 'जनसुरक्षा विधेयक'; राज्यविघातक कारवायांना कसा होईल प्रतिबंध ?, जाणून घ्या सविस्तर माहिती

Udaipur File Film Controversy : 'उदयपूर फाईल्स'च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा; सर्वोच्च न्यायालयानं बंदी घालण्याच्या मागणीची याचिका फेटाळली