महाराष्ट्र

Sanjay Raut | "फडणवीसांनी या डबक्यात उतरु नये, त्यांची अप्रतिष्ठा होईल"

Published by : Shweta Chavan-Zagade

एकनाथ शिंदेसोबत असलेल्या बंडखोर आमदारांना आसामचं वातावरण एन्जॉय करण्यासाठी वेळ मिळाला आहे. त्यामुळे 11 जुलैपर्यंत त्यांना आसाममध्ये आराम करायचा आहे. महाराष्ट्रात या बंडखोरांचं काही काम नाही, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी केलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही सल्ला दिला आहे. या बेडक्यांच्या डबक्यात पडू नका, असा सल्ला राऊतांनी दिला आहे. लवकरच ठाण्यामध्ये तुम्हाला वेगळं चित्र दिसेल असंही सूचक वक्तव्यही त्यांनी केलं आहे.

आज मुंबईत माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीस राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत, त्यांच्याकडे ११६ आमदारांचं बळ आहे. हा विरोधी पक्ष विधायक काम चांगल्या पद्धतीने करुन महाराष्ट्राला पुढे नेऊ शकतो. फडणवीस यांच्याकडे ती क्षमता आहे. पण त्यांनी या डबक्यात उतरू नये. काही लोकांनी आता एक डबक तयार केलं आहे. त्यामुळे त्यांनी या डबक्यात उतरू नये अन्यथा पंतप्रधान मोदी, ते स्वत: आणि पक्षाची प्रतिष्ठा धुळीस मिळेल, असंही त्यांनी सांगितलं.

राज्यपाल यांच्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, १२ आमदार राजभवनाच्या टेबलावर पडून आहेत, त्यासंदर्भात निर्णय घ्यावा, असा टोला राऊतांनी राज्यपाल कोश्यारींना लगावला आहे. राऊत म्हणाले, बंडखोरांपैकी अनेकजण आमच्या संपर्कात आहेत. कोर्टाच्या निर्णयानंतर बंडखोर चलबिचल झाले आहेत. मुख्यमंत्र्यांना काय करायचं हा त्यांचा निर्णय असून तो घेण्यासाठी ते सक्षम आणि समर्थ आहेत. गुवाहाटीमध्ये बसुन सल्ले देण्याची गरज नाही, असा अप्रत्यक्ष टोलाही त्यांनी एकनाथ शिंदेसह बंडखोर आमदारांना लगावला आहे.

"परळी तालुक्यात अधिकाऱ्यांना धमकावून बोगस मतदान "; ट्वीटरवर व्हिडीओ शेअर करत आमदार रोहित पवारांनी केले गंभीर आरोप

IPL 2024 : अभिषेक-क्लासेनचा झंझावात! वादळी खेळी करून पंजाब किंग्जचा उडवला धुव्वा, हैदराबादचा दमदार विजय

"पाकिस्तानचा झेंडा घेऊन मिरवणाऱ्या उबाठाच्या उमेदवारांवर कारवाई करा"; किरण पावसकरांचा ठाकरेंवर हल्लाबोल

IPL 2024 : आरसीबीने CSK विरोधात रचला इतिहास; टी-२० क्रिकेटमध्ये 'हा' कारनामा करणारा ठरला पहिला संघ

"लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांमध्ये महाविकास आघाडीनेच बाजी मारलीय"; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा मोठा दावा