महाराष्ट्र

“सर्वोच्च न्यायालय खिशात असल्याची केंद्राची भूमिका”

Published by : Lokshahi News

संसदेत केंद्र सरकारवर दबाव वाढवण्यासाठी विरोधी पक्षांनी शुक्रवारी सकाळी दहा वाजता बैठक बोलावली असून त्यात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधीही सहभागी होणार आहेत. सध्या पेगॅससचं प्रकरण गाजत आहे. मात्र त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत याविषयी भाष्य केलं आहे.

संसदीय अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधीपक्ष पेगॅससच्या प्रकरणावर चर्चेची मागणी करत आहे. मात्र केंद्र सरकरा याबद्दल काहीही ऐकून घ्यायला तयार नाही. या प्रकरणातील सत्य बाहेर आलं पाहीजे, असं राऊत म्हणाले.

सरकार सर्वोच्च न्यायलयाचंही ऐकत नसेल तर हे सरकार देशातले लोकशाहीचे चार स्तंभ मोडीत काढायला निघाले आहे. संसद, न्यायालय, प्रशासन आणि माध्यमं कोणाच्याही संदर्भात सरकारची भूमिका ही प्रामाणिकपणाची नाही. जर सर्वोच्च न्यायालयाचे सरकार ऐकायला तयार नसेल तर, सर्वोच्च न्यायालय आमच्या खिशात आहे, या भूमिकेत सरकार आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलंय.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मनसे - शिवसेनेचा आज मुंबईत विजयी मेळावा

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या कामांना यश मिळण्याची शक्यता , कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?