Police Vijay Sawant & Students' Burning Bus Team Lokshahi
महाराष्ट्र

शाळकरी मुलांच्या चालत्या बसने घेतला पेट; सातारा पोलिस बनले सिंघम!

सातारा पोलिसाच्या सतर्कतेमुळे वाचले 21 शाळकरी मुलांचे प्राण.

Published by : Vikrant Shinde

प्रशांत जगताप | सातारा: सातारा शहरानजीक असलेल्या खावली गावानजीक एका शाळकरी बसने अचानक पेट घेतला. ही बस सातारा येथील एका खाजगी शाळेतील मुलांना घेऊन कोरेगावच्या दिशेनं चालली होती. चालत्या बसमध्ये अचानक शॉर्टसर्किट झाल्यानं पेट घेतला.

ही बाब ड्युटी संपवून गावी चाललेल्या सातारा पोलिसाच्या निदर्शनात आल्याने त्यांनी बस चालकाला बस थांबण्याची विनंती केली. त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता बसमधील मुलांना त्यांच्या शालेय साहित्यासह सुखरूप बाहेर काढलं.

या बसमधून 21 मुलं घरी जात होती. सातारा पोलिसाच्या सतर्कतेमुळे मोठी जीवित हानी टळली आहे. बसने अचानक पेट घेतल्यानं धुराचे लोट निर्माण झाले होते. रस्त्यावरून जाणारे प्रवासी आणि नागरिक मोठ्या संख्येनं जमा झाले. पोलिसाने स्थानिकांच्या मदतीने पेटलेली स्कूल बस विझवल्याने पोलिसाचे आभार मानण्यात आले असून या आगीत बसचे नुकसान झाले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराचा गोड प्रसाद

Manikrav Kokate : रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी जिनॅस्ट संयुक्ताला क्रीडामंत्र्यांचा फोन; 'महाराष्ट्राची हिरकणी' म्हणून संबोधत गौरविले

Palghar Gas Leak : बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायुगळती; 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जखमी

Ganesh Festival Pune 2025 : बाप्पा पावला! गणेशोत्सवात 24 तास धावणार मेट्रो, एकदा पाहा वेळापत्रक