Police Vijay Sawant & Students' Burning Bus Team Lokshahi
महाराष्ट्र

शाळकरी मुलांच्या चालत्या बसने घेतला पेट; सातारा पोलिस बनले सिंघम!

सातारा पोलिसाच्या सतर्कतेमुळे वाचले 21 शाळकरी मुलांचे प्राण.

Published by : Vikrant Shinde

प्रशांत जगताप | सातारा: सातारा शहरानजीक असलेल्या खावली गावानजीक एका शाळकरी बसने अचानक पेट घेतला. ही बस सातारा येथील एका खाजगी शाळेतील मुलांना घेऊन कोरेगावच्या दिशेनं चालली होती. चालत्या बसमध्ये अचानक शॉर्टसर्किट झाल्यानं पेट घेतला.

ही बाब ड्युटी संपवून गावी चाललेल्या सातारा पोलिसाच्या निदर्शनात आल्याने त्यांनी बस चालकाला बस थांबण्याची विनंती केली. त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता बसमधील मुलांना त्यांच्या शालेय साहित्यासह सुखरूप बाहेर काढलं.

या बसमधून 21 मुलं घरी जात होती. सातारा पोलिसाच्या सतर्कतेमुळे मोठी जीवित हानी टळली आहे. बसने अचानक पेट घेतल्यानं धुराचे लोट निर्माण झाले होते. रस्त्यावरून जाणारे प्रवासी आणि नागरिक मोठ्या संख्येनं जमा झाले. पोलिसाने स्थानिकांच्या मदतीने पेटलेली स्कूल बस विझवल्याने पोलिसाचे आभार मानण्यात आले असून या आगीत बसचे नुकसान झाले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा