Police Vijay Sawant & Students' Burning Bus Team Lokshahi
महाराष्ट्र

शाळकरी मुलांच्या चालत्या बसने घेतला पेट; सातारा पोलिस बनले सिंघम!

सातारा पोलिसाच्या सतर्कतेमुळे वाचले 21 शाळकरी मुलांचे प्राण.

Published by : Vikrant Shinde

प्रशांत जगताप | सातारा: सातारा शहरानजीक असलेल्या खावली गावानजीक एका शाळकरी बसने अचानक पेट घेतला. ही बस सातारा येथील एका खाजगी शाळेतील मुलांना घेऊन कोरेगावच्या दिशेनं चालली होती. चालत्या बसमध्ये अचानक शॉर्टसर्किट झाल्यानं पेट घेतला.

ही बाब ड्युटी संपवून गावी चाललेल्या सातारा पोलिसाच्या निदर्शनात आल्याने त्यांनी बस चालकाला बस थांबण्याची विनंती केली. त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता बसमधील मुलांना त्यांच्या शालेय साहित्यासह सुखरूप बाहेर काढलं.

या बसमधून 21 मुलं घरी जात होती. सातारा पोलिसाच्या सतर्कतेमुळे मोठी जीवित हानी टळली आहे. बसने अचानक पेट घेतल्यानं धुराचे लोट निर्माण झाले होते. रस्त्यावरून जाणारे प्रवासी आणि नागरिक मोठ्या संख्येनं जमा झाले. पोलिसाने स्थानिकांच्या मदतीने पेटलेली स्कूल बस विझवल्याने पोलिसाचे आभार मानण्यात आले असून या आगीत बसचे नुकसान झाले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Eknath shinde On Thackeray vijayi melava : "...त्यासाठी मनगटात जोर लागतो", ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Raj Thackeray : भाषणानंतर राज ठाकरेंनी व्यक्त केली होती दिलगिरी, कारण ऐकून बसेल धक्का...

Devendra Fadanvis On Vijayi Melava : विजयी मेळाव्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मानले खोचक आभार ; म्हणाले, "मला जबाबदार धरलं त्यासाठी..."

Nitesh Rane On Thackeray Brothers : "यांच्यात नवरा कोण आणि नवरी कोण?" ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया