महाराष्ट्र

Fishing Rules : समुद्रातील मासेमारी बंद ; शासनाचे आदेश जारी, दरात होणार वाढ ?

माशांच्या संवर्धनासाठी शासनाची कठोर पावले; खोल समुद्रात मासेमारी बंद

Published by : Shamal Sawant

यंदा महाराष्ट्रात 12 दिवस आधीच मान्सुन ला सुरुवात झाली आहे. तसेच येत्या काही दिवसांत समुद्रात वादळी वारे आणि मुसळधार पावसाची शक्यत हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभुमीवर महाराष्ट्र शासनाकडून 1 ते 31 जुलैपर्यंत मासेमारीसाठी शासकीय बंदी लागू करण्यात आली आहे. ही बंदी 31 जुलैपर्यंत लागू राहणार असून, या कालावधीत खोल समुद्रात मासेमारी केली असता किव्हा नियमांचे उल्लंघन केले तर मत्स्यविभागाकडून कठोर कारवाई केली जाणार आहे.

1 जून ते 31 जुलै पर्यंत मासेमारीला बंदी

मत्स्य व्यवसाय कोकण किनारपट्टीवरील नागरिकांचा प्रमुख व्यवसाय आहे. त्यांच्या आर्थिक उत्पादनाचे मुख्य साधन आहे.मोठ्या समुद्रकिनाऱ्यामुळे मासेमारीचा व्यवसाय हा येथील प्रमुख व्यवसाय आहे. मात्र यंदा 1 जुन ते 31 जुलै पर्यंत हे आर्थिक उत्पन्न बंद असणार आहे. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 व सुधारणा अध्यादेशाद्वारे यंदा दि.1 जून ते 31 जुलै 2025 (दोन्ही दिवस धरुन 61 दिवस) समुद्रातील खोल मासेमारीला बंदी असणार आहे. या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या जल क्षेत्रात यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी आणि स्वयंचलित नौकांना खोल समुद्रात मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. बंदी कालावधीत स्वयंचलित व यांत्रिकी अश्या कोणत्या हि नौकांद्वारे खोल समुद्रात मासेमारी केली जाणार नाही.

या कालावधीत सागरी कायद्याचा भंग करुन मासेमारी केली तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे मत्स्यव्यवसाय विभागाने सांगितले आहे. त्यामुळे मच्छिमारांना खोल समुद्रात मच्छिमारी न करता आपल्या बोटी किनाऱ्यावर दाखल करण्याच्या सूचना मत्स्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत. असे असताना किनारी भागात बिना यांत्रिक बोटीमधून काळजी घेऊन पारंपरिक मासेमारी करण्यास मात्र परवानगी देण्यात आली आहे.

माश्यांचा प्रजनन काळ आणि मत्स्यनिर्मिती

साधारण जून-जुलै महिन्यांचा काळ हा माशांच्या प्रजनन काळ असतो. या काळात अनेक प्रजाती प्रजनन अवस्थेत असतात. त्यामुळे माशांची संख्या टिकवून ठेवण्यासाठी ही बंदी अत्यावश्यक मानली जाते. त्यामुळे मत्स्यनिर्मिती ही मोठ्या प्रमाणावर होते. या दोन महिन्यांच्या मासेमारी बंदी मुळे समुद्रात येणाऱ्या वादळी लाटांपासून तर मच्चीमारांचे संरक्षण तर होतेच मात्र त्याचबरोबर माश्यांची संख्या ही ह्या काळात वाढते. यामुळे मासे आणि इतर सागरी जीवांचे संवर्धन होण्यास मदत होते.

मासे खवय्यांच्या खिशाला कात्री

1 जुन ते 31 जुलै या दोन महिन्यांच्या कालावधीत मासेमारी बंद असल्यामुळे बाजारात माश्यांची आवक कमी होणार आहे. परिणामी माश्यांचे भाव वाढण्याची दाट शक्यता आहे. या काळात मासेमारी बंदीमुळे बाजारात माशांचा पुरवठा कमी होतो.त्यामुळे परिणामी मासे खवय्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लागण्याची शक्यता आहे. परिणामी नदीकिनारी मिळणाऱ्या गोड्या पाण्यातील माश्यांची मागणी वाढणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Saath Nibhana Saathiya Gopi Bahu : 'साथ निभाना साथिया' फेम 'गोपी बहू'ने गुपचुप केले लग्न, जाणून घ्या कोण आहे? जियाचा नवरा

GST Slab : आता अनेक वस्तूंवरील कर दर कमी होणार! GST चे चार पैकी दोन स्लॅब रद्द होणार; सर्वसामान्यांना मोठा दिलासा

Uttar Pradesh Crime : नोरा फतेहीसारखी फिगर मिळवण्यासाठी पतीने केला पत्नीचा छळ; नेमकं प्रकरण काय?

Asia Cup 2025 : ब्रोंको टेस्ट पास करा तरचं संघात चान्स! BCCI चा नवा नियम; ब्रोंको टेस्ट म्हणजे काय? Bronco Test