महाराष्ट्र

Maharashtra Corona | सलग दुसऱ्या दिवशी रूग्णसंख्या ५ हजारा पार

Published by : Lokshahi News

राज्यात गेल्या दोन दिवसात कोरोना रुग्णाचा आकडा ५ हजारांचा पार जात असल्याचं चित्र आहे. आज दिवसभरात ५ हजार १०८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्य सरकारसह आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली आहे.

आज दिवसभरात ४ हजार ७३६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. राज्यात आतापर्यंत ६२ लाख ५२ हजार १५० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७.०४ टक्के इतकं झालं आहे. दुसरीकडे १५९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के इतका आहे. सध्या राज्यात ५० हजार ३९३ सक्रिय रुग्ण आहेत.

मुंबईत ३९७ नवे बाधित

मुंबईत आज दिवसभरात ३९७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ५०७ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ टक्के आहे. तर दिवसभरात ७ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आतापर्यंत एकूण ७ लाख ४२ हजार ४०१ जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ७ लाख २१ हजार २५७ जणांनी करोनावर मात केली आहे. सध्या मुंबईत २ हजार ७३६ सक्रिय रुग्ण आहेत. तर करोनामुळे आतापर्यंत एकून १५ हजार ९६३ जणांचा मृत्यू झाला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद