महाराष्ट्र

Maharashtra Corona | सलग दुसऱ्या दिवशी रूग्णसंख्या ५ हजारा पार

Published by : Lokshahi News

राज्यात गेल्या दोन दिवसात कोरोना रुग्णाचा आकडा ५ हजारांचा पार जात असल्याचं चित्र आहे. आज दिवसभरात ५ हजार १०८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्य सरकारसह आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली आहे.

आज दिवसभरात ४ हजार ७३६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. राज्यात आतापर्यंत ६२ लाख ५२ हजार १५० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७.०४ टक्के इतकं झालं आहे. दुसरीकडे १५९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के इतका आहे. सध्या राज्यात ५० हजार ३९३ सक्रिय रुग्ण आहेत.

मुंबईत ३९७ नवे बाधित

मुंबईत आज दिवसभरात ३९७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ५०७ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ टक्के आहे. तर दिवसभरात ७ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आतापर्यंत एकूण ७ लाख ४२ हजार ४०१ जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ७ लाख २१ हजार २५७ जणांनी करोनावर मात केली आहे. सध्या मुंबईत २ हजार ७३६ सक्रिय रुग्ण आहेत. तर करोनामुळे आतापर्यंत एकून १५ हजार ९६३ जणांचा मृत्यू झाला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा