महाराष्ट्र

उस्मानाबादमध्ये पोलिसासह गावकऱ्याकडून अत्याचार, महिलेचा गंभीर आरोप

Published by : Lokshahi News

महाराष्ट्रात रोज महिला अत्याचाराच्या नव्या घटना समोर येत आहेत. उस्मानाबाद जिल्ह्याच्या परंडा तालुक्यातही अशीच एक घटना घडली आहे. एका पोलिसासह गावातील एकाने पळवून नेऊन पाच दिवस आपल्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप या महिलेने केला आहे.

तीन दिवसांपूर्वी याच महिलेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यात या महिलेला तिचा पती तिला उकळत्या तेलात हात घालून नाणं काढण्यात सांगतो. महिलेच्या चारित्र्याची परीक्षा असल्याचे या व्हिडीओत दिसत होते. या व्हिडीओतून हे प्रकरण समोर आले. आता या प्रकरणाची राज्यात चर्चा सुरू आहे. महिला अत्याचाराच्या या प्रकरणामुळे पारधी समाज आक्रमक झाला आहे आणि त्यांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.

महिलांवरील अत्याचार थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे तिने आणखी किती अत्याचार सहन करायचे, असा सवाल केला जात आहे. त्याचवेळी ज्यांनी संरक्षण करायचे, त्या पोलिसांवर महिला अत्याचाराचा गंभीर आरोप होत असेल तर विश्वास ठेवायचा तरी कुणावर?, असा सवालही केला जात आहे. शिवशाहीचा वारंवार उल्लेख करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या प्रकरणाची गंभीर दखल घेतील आणि सखोल चौकशी करून पीडितेला न्याय मिळवून देतील, अशी अपेक्षा तिच्या कुटुंबीयांना आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा