Washim bus accident team lokshahi
महाराष्ट्र

शिवशाही बसचा टायर निखळल्याची धक्कादायक घटना, 3 चाकावर बस धावल्याने प्रवाश्यांचा जीव टांगणीला...

भंगार गाड्या चालवणे कधी बंद करणार असा संतप्त सवाल प्रवाशांमधून उपस्थित केला जात आहे.

Published by : Team Lokshahi

गोपाल व्यास|वाशिम: वाशिमच्या लोणी जवळ रिसोड - संभाजीनगर शिवशाही बसचा अचानक टायर निखळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 3 चाकावर बस धावल्याने बस मध्ये बसलेल्या प्रवाशांचा जीव टांगणीला लागलेला पाहायला मिळाला आहे. यावेळी भंगार गाड्या चालवणे कधी बंद करणार असा संतप्त सवाल प्रवाशांमधून उपस्थित केला जात आहे.

चालत्या बसचा टायर निखळल्याने बसमध्ये बसलेल्या प्रवाशांमध्ये एकच खळबळ माजली आहे. चालकाच्या प्रसंगावधनामुळे 50 प्रवाशांचे प्राण वाचले असे म्हणण्याची वेळ आली आहे.

सध्या बहुतांश बसेस भंगार अवस्थेत आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्वरित लक्ष देऊन भंगार बसेस बंद करून नवीन बसेस प्रवाशांच्या सोयीसाठी उपलब्ध करण्याची मागणी यावेळी प्रवासी करीत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Donald Trump : "मी भारताचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अत्यंत जवळचा,पण..." डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान

Latest Marathi News Update live : नागपुरात आज राष्ट्रवादीचं चिंतन शिबीर

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकन संसदेबाहेर उभारला 12 फुटी पुतळा

Neeraj Chopra : जागतिक स्पर्धेत नीरज आठव्या स्थानी; तर सचिन यादवची लक्षवेधी कामगिरी