Varsha gaikwad Team Lokshahi
महाराष्ट्र

10वी, 12वीचा निकाल कधी? वर्षा गायकवाड म्हणाल्या...

SSC-HSC Result : वर्षा गायकवाड यांची महत्वपूर्ण घोषणा

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राज्यातील दहावी-बारावीच्या (SSC-HSC Result) विद्यार्थी-पालकांना निकालाची प्रतिक्षा लागली आहे. याच संदर्भात आज मोठी माहिती समोर आली आहे. बारावीचा निकाल पुढील आठवड्यात लागणार तर दहावीचा त्यानंतर 15 दिवसांनी लागणार असल्याची माहिती संदर्भात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिली आहे.

यंदाच्या दहावी-बारावीच्या निकालासंदर्भात थोडा संभ्रम निर्माण झाला होता. महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या सुमारे 30 हजार सदस्यांनी म्हणजेच विनाअनुदानीत शिक्षकांनी यंदा उत्तरपत्रिका तपासण्यावर बहिष्कार टाकला होता. विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांनी पेपर तपासण्यास स्पष्ट नकार दिला. शिक्षकांच्या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांची चिंता वाढली होती. परंतु, आता वर्षा गायकवाड यांनी निकालासंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे.

यानुसार बारावीचा निकाल पुढील आठवड्यात 6 किंवा 7 तारखेला घोषित होण्याची शक्यता आहे. तर दहावीचा त्यानंतर 15 दिवसांनी म्हणजेच 23 किंवा 24 तारखेला लागणार असल्याची शक्यता आहे. याशिवाय, टीईटी (TET) परीक्षा कोणाला घ्यायला सांगायचे हे तीन कंपन्यांमध्ये ठरवले जाईल, असे विधान वर्षा गायकवाड यांनी केले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा