थोडक्यात
'रोहित आर्य प्रकरणी अहवाल सादर करा'
राज्य मानवाधिकार आयोगाचे आदेश
पोलिसांना आठ आठवड्यांची मुदत
(Rohit Arya Case) मुंबईतील पवई परिसरात एका व्यक्तीनं तब्बल 17 लहानग्यांसह 20 जणांना ओलीस ठेवलं होतं. रोहित आर्या असे त्या व्यक्तीचं नाव होते. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत तातडीने कारवाई करत काही तासांतच सर्व मुलांची सुखरूप सुटका केली.
या प्रकरणानंतर संपूर्ण परिसरात प्रचंड गोंधळ उडाला. त्याने सोशल मीडियावर याबाबतचा एक व्हिडीओ देखील शेअर केला होता. पोलीस स्टुडिओच्या बाथरूममधून आत शिरले. यावेळी रोहित आर्य आणि पोलिसांमध्ये चकमक झाली आणि या चकमकीत आरोपी जखमी झाला. आरोपीला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण, आरोपीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
रोहित आर्य प्रकरणी अहवाल सादर करण्याचे राज्य मानवाधिकार आयोगाने आदेश दिले असल्याची माहिती मिळत आहे. 'रोहित आर्य प्रकरणी अहवाल सादर करा' असे आदेश राज्य मानवाधिकार आयोगाने दिले आहेत. मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना आठ आठवड्यांची मुदत देण्यात आल्याची माहिती मिळत असून या घटनेचा सखोल तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.