महाराष्ट्र

पंधराव्या वित्त आयोगाची तरतूद; राज्याला १, ४५६ कोटींचा निधी

Published by : Lokshahi News

लोकशाही न्यूज नेटवर्क

केंद्राकडून राज्याला १ हजार ४५६ कोटींचा निधी मिळाल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. पंधराव्या वित्त आयोगाकडून संबंधित रक्कम प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे ग्रामंपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांसाठी अतिरिक्त निधी उपलब्ध झाला आहे. सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांना अनुक्रमे ८०:१०:१० प्रमाणे निधी वितरीत करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे.

यामध्ये २०२०-२१ वर्षासाठी एकूण ५ हजार ८२७ कोटी निधीची तरतुद आहे. यापूर्वी २ हजार ९१३ कोटी ५० लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. हा हफ्त्याचा पहिला टप्पा होता. हा निधी जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींसाठी खर्च करण्यासाठी या आधीच वितरीत करण्यात आला होता. पंधराव्या वित्त आयोगातून आतापर्यंत ४ हजार ३७० कोटी २५ लाख रुपये निधी प्राप्त झाल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

या योजनेतून सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी निधीचा वापर करत चांगल्या विकासकामांची निर्मिती करावी, असे आवाहन मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. विशेष म्हणजे या निधीतील ८० टक्के भाग थेट ग्रामपंचायतींना विकासकामांसाठी मिळणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींचा थेट सहभाग यामध्ये वाढणार आहे. उर्वरित निधीपैकी १० टक्के निधी जिल्हा परिषद तर अन्य १० टक्के निधी पंचायत समित्यांना मिळणार असल्याची माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली.

लोकसभेत का जायचंय? बीडच्या सभेत पंकजा मुंडेंनी सांगितलं खरं कारण, म्हणाल्या; "खासदार झाल्यावर..."

Daily Horoscope 12 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांचे आर्थिक समस्या दूर होतील; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 12 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

"कौरवांच्या विरोधात आमची पांडव सेना निवडणुकीच्या रिंगणात उतरले" पुण्यात उपमुख्यमंत्री फडणवीस कडाडले

GT vs CSK : शुबमन गिलच्या नावावर 'या' जबरदस्त विक्रमाची नोंद, अहमदाबादच्या मैदानात पाडला धावांचा पाऊस