विकास काजळे | इगतपुरी तालुक्यातील एनसीसीमध्ये निवड न झाल्याने एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. वैभव दत्तू मते वय 18 असे या तरुणाचे नाव आहे. या घटनेने मुरंबी गावावर शोककळा पसरली आहे
मुरंबी येथे वैभव दत्तू मते या युवकाने स्वतःच्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची दुःखद घटना घडली आहे. नामांकित महाविद्यालयात एनसीसीमध्ये निवड न झाल्याने त्याने टोकाचे पाऊल उचलले. तसेच वैभवची सैन्य भरती साठी जोरदार तयारी सुरू होती. परंतू नैराश्य आल्याने वैभवने आत्महत्या केली आहे. त्यामुळे मुरंबी गावावर शोककळा पसरली आहे.