Shinde-fadnavis Goverment Team Lokshahi
महाराष्ट्र

शिंदे-फडणवीस सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका

राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या नियुक्ती करण्यास सर्वोच्च न्यायालयाने केली मनाई

Published by : Sagar Pradhan

राज्यात राजकीय गोंधळ सुरु असताना, आज महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या गटाला न्यायालयाने धक्का देत, निवडणूक आयोगाच्या दरबारी हा निर्णय घेण्याचे ठरवले आहे. त्यामुळे शिंदे गटात आनंदाचं वातावरण असताना. सर्वोच्च न्यायालयाने राज्यपाल नियुक्त आमदारांच्या मुद्दावरून शिंदे-फडणवीस सरकारला धक्का दिला आहे.

राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या नियुक्ती करण्यास सर्वोच्च न्यायालयाने मनाई केली आहे. राज्यपाल नियुक्त बारा आमदारांवर मागील सुनावणी प्रलंबित असताना नवे शिंदे-फडणवीस सरकार पुन्हा नव्याने बारा आमदारसाठी यादी तयार करणा असल्याने सर्वोच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिली आहे.

राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणी कोणतीही कारवाई सरकारने करू नये असे आदेश न्यायालयाने दिले. हा शिंदे सरकारसाठी मोठा धक्का मानला जातो.

महाविकास आघाडी सरकाने राज्यपालांनी विधान परिषदेवर १२ आमदारांची नियुक्त करावी, यासाठी पत्र दिले होते. मात्र, त्या पत्रावर राज्यपालांनी दीड वर्ष कोणताही निर्णय घेतला नव्हाता. त्यानंतर राज्यात सत्तातर झाल्यानंतर राज्यपालांनी महाविकास आघाडी सरकारने दिलेले पत्र फेटाळून लावले होते. त्यामुळे या न्यायालयाच्या या निर्णयामुळे राज्यपाल देखील आता अडचणीत आले असून त्यांना आमदारांच्या नियुक्त्या करता येणार नाही, हे आता स्पष्ट झालं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mutual Fund : म्युच्युअल फंडातील गडगडाट! ऑगस्टमध्ये गुंतवणुकीत मोठी घट

Latest Marathi News Update live : नगरपालिकेच्या हद्दीत मिळणार घरकुल योजनेचा लाभ ...

Ladki Bahin Yojana : महिला लाभार्थींना दिलासा, ऑगस्ट हप्त्याचा निधी अंतिम टप्प्यात

Crime : पैशासाठी माणुसकीला तिलांजली; जमिनीच्या वादामुळे दोन दिवस मृतदेह अडकला