महाराष्ट्र

नंदुरबारच्या तापी नदीवरील पुलाचा भराव खचला; वाहतूक केली बंद

Published by : Lokshahi News

प्रशांत जव्हेरी, नंदुरबार | नंदुरबारच्या सारंगखेडा येथील तापी नदीवरील पुलाचा भराव खचल्याची घटना घडली आहे. पुलाचा भराव खचल्याने वाहतूक करणे धोक्याचे असल्याने एका साईडची वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच पुलाच्या दुरुस्तीचे काम करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी दिली आहे.

अतिवृष्टीमुळे सारंगखेडा येथील टाकरखेडा गावाजवळ तापी नदीवरील पुलाचा भराव खचला आहे.भराव खचल्यामुळे पुलावरून जाणाऱ्या वाहनांना धोका निर्माण झाला आहे. पुलाची दयनीय अवस्था झाली असून मोठा अनर्थ घडल्यानंतर पुलाची दुरुस्ती करणार का असा प्रश्न गावकरी व वाहन धारकांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान पुलाला असलेला भराव खचल्याने वाहतूक करणे धोक्याचे ठरत आहे. पूलाच्या एका साईडची वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून पुलाचे दुरुस्तीचे काम करण्याचे आदेश देण्यात आले आहे असे जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी सांगितले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup 2025 IND vs PAK Live Update : पाकिस्तानची टोळी 127 धावांवर बाद, भारतासमोर 128 धावांचे आव्हान

PM Narendra Modi On Congress : “मी शिवाचा भक्त, विषही प्राशन करेन” पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींंना दागिने खरेदी करण्यासाठी उत्तम योग, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार