महाराष्ट्र

तौक्ते चक्रीवादळाच्या नुकसान भरपाईत दुजाभाव; भाजपाचा गंभीर आरोप

Published by : Lokshahi News

समीर महाडेश्वर | तौक्ते चक्रीवादळात झालेलय़ा नागरिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडून मदत वाटप करण्यात आली आहे. माञ या नुकसान भरपाईत आता दुजाभाव झाल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. त्यासोबत संबंधितांचे फेरपंचनामे करा आणि त्यांना तातडीने मदत द्या अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात येत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात झालेल्या तौक्ते वादळामुळे मच्छिमारांना देखील मोठा फटका बसला आहे. येथील नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडून मदत वाटप करण्यात येत आहे. मात्र नुकसान भरपाई वाटपात पक्षपात झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. काही विशिष्ट व्यक्तींना ही मदत मिळवून देताना खऱ्या लाभार्थ्यांना मदतीपासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप भाजपचे प्रदेश सदस्य दत्ता सामंत यांनी केला आहे. तसेच दत्ता सामंत यांनी जवळपास ४०० लाभार्थ्यांची यादी शिष्टमंडळाने मत्स्य आयुक्त कार्यालय तसेच मालवण तहसीलदार यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर सादर केली. यावेळी ज्यांची खरीच नुकसान झाले आहे, त्यांना मदत मिळालीच पाहिजे असे म्हणत, संबंधितांचे फेरपंचनामे करा आणि त्यांना तातडीने मदत द्या अशी मागणी यावेळी भाजपच्या वतीने करण्यात आली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Nashik-Mumbai Highway Accident : नाशिक-मुंबई महामार्गावर भीषण अपघात! बस चालकाचं नियंत्रण सुटलं अन्...15 ते 20 प्रवासी

Beed Rain : बीडमध्ये पावसाचा हाहाकार! सहा गावांमध्ये 44 जण अडकले, बचाव मोहिमेसाठी...

Asia Cup 2025 IND vs PAK : हस्तांदोलन वादावरून पाकिस्तानचा संताप उफाळला! आयसीसीसमोर ठेवले अल्टिमेटम

Beed Govind Barge : माजी उपसरपंच आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट! नर्तिका पूजा गायकवाडला गायकवाडला न्यायालयीन कोठडी