महाराष्ट्र

तौक्ते चक्रीवादळाच्या नुकसान भरपाईत दुजाभाव; भाजपाचा गंभीर आरोप

Published by : Lokshahi News

समीर महाडेश्वर | तौक्ते चक्रीवादळात झालेलय़ा नागरिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडून मदत वाटप करण्यात आली आहे. माञ या नुकसान भरपाईत आता दुजाभाव झाल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. त्यासोबत संबंधितांचे फेरपंचनामे करा आणि त्यांना तातडीने मदत द्या अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात येत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात झालेल्या तौक्ते वादळामुळे मच्छिमारांना देखील मोठा फटका बसला आहे. येथील नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडून मदत वाटप करण्यात येत आहे. मात्र नुकसान भरपाई वाटपात पक्षपात झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. काही विशिष्ट व्यक्तींना ही मदत मिळवून देताना खऱ्या लाभार्थ्यांना मदतीपासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप भाजपचे प्रदेश सदस्य दत्ता सामंत यांनी केला आहे. तसेच दत्ता सामंत यांनी जवळपास ४०० लाभार्थ्यांची यादी शिष्टमंडळाने मत्स्य आयुक्त कार्यालय तसेच मालवण तहसीलदार यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर सादर केली. यावेळी ज्यांची खरीच नुकसान झाले आहे, त्यांना मदत मिळालीच पाहिजे असे म्हणत, संबंधितांचे फेरपंचनामे करा आणि त्यांना तातडीने मदत द्या अशी मागणी यावेळी भाजपच्या वतीने करण्यात आली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा